Middle East War : मध्यपूर्व युद्ध पुन्हा पेटलं! इराणचा भारताला संपर्क, उच्चस्तरीय चर्चा सुरु

मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मूझ सामुद्रधुनी सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतालाही याचे थेट परिणाम जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी इराणकडून थेट संपर्क साधण्यात आला आहे.



भारत-इराण उच्चस्तरीय चर्चा


इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जयशंकर यांना फोन करून सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. याचबरोबर कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्यासोबतही भारताने संवाद साधला. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.



ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम


दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मूझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती समोर आली आहे. “सामुद्रधुनी खुली केली नाही तर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही देण्यात आल्याचे सांगितले जाते.



भारताची जहाजे अडकली


होर्मूझ सामुद्रधुनीत तणाव वाढल्यामुळे भारतासह अनेक देशांची जहाजे अडकली असल्याची माहिती आहे. ही ३२ किमी अंतर असलेली सामुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असून, जगातील मोठ्या प्रमाणात कच्चे तेलाची याच मार्गाने जलवाहतूक केली जाते.



तेल दरवाढ आणि जागतिक परिणाम


सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या आहेत. अनेक देशांमध्ये इंधन तुटवडा आणि आर्थिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतात पुरेसा तेल साठा आणि गॅससाठा असला तरी अनेक देशांत तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरू शकते.


होर्मूझ सामुद्रधुनीतील तणाव हा केवळ प्रादेशिक मुद्दा राहिलेला नसून जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. इतर देशांमध्ये या युद्धामुळे कोणतीही भीषण परिस्थिती जाणवू नये यासाठी भारतासह अनेक देश परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत

Comments
Add Comment

Jharkhand Road Accident News : रामगडमध्ये ट्रकची प्रवासी वाहनाला भीषण धडक; ७ जणांचा मृत्यू

झारखंड : झारखंडमधील रामगड (Ramgarh) जिल्ह्यातील रजरप्पा पोलीस ठाणे (Rajrappa Police Station) हद्दीतील लारी-बरलौंग परिसरात गुरुवारी

Mahesh Dixit Appointed IB Chief : महेश दीक्षित यांची आयबी (IB) प्रमुखपदी नियुक्ती; कोण आहेत हे वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील सर्वात महत्त्वाची अंतर्गत गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau-IB) च्या

Amazon CEO Andy Jassy : ॲमेझॉनची भारतात २०३० पर्यंत ४८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार; अँडी जेसी यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर केली घोषणा

नवी दिल्ली : जगातील आघाडीची ई-कॉमर्स आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ॲमेझॉनने गुरुवारी भारतात २०२६ ते

Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर थरारक प्रसंग! एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने आली समोरासमोर; मोठा अपघात टळला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर बुधवार २४ जून रोजी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली

Air India Plane : एअर इंडियाचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) च्या विमानासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे

Indian Passport : पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी; MEA ने नागरिकत्वाबाबत दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट (Indian Passport) हा नागरिकत्वाचा (Citizenship) पुरावा नसून तो केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International Travel)