Middle East War : मध्यपूर्व युद्ध पुन्हा पेटलं! इराणचा भारताला संपर्क, उच्चस्तरीय चर्चा सुरु

मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मूझ सामुद्रधुनी सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतालाही याचे थेट परिणाम जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी इराणकडून थेट संपर्क साधण्यात आला आहे.



भारत-इराण उच्चस्तरीय चर्चा


इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जयशंकर यांना फोन करून सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. याचबरोबर कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्यासोबतही भारताने संवाद साधला. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.



ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम


दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मूझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती समोर आली आहे. “सामुद्रधुनी खुली केली नाही तर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही देण्यात आल्याचे सांगितले जाते.



भारताची जहाजे अडकली


होर्मूझ सामुद्रधुनीत तणाव वाढल्यामुळे भारतासह अनेक देशांची जहाजे अडकली असल्याची माहिती आहे. ही ३२ किमी अंतर असलेली सामुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असून, जगातील मोठ्या प्रमाणात कच्चे तेलाची याच मार्गाने जलवाहतूक केली जाते.



तेल दरवाढ आणि जागतिक परिणाम


सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या आहेत. अनेक देशांमध्ये इंधन तुटवडा आणि आर्थिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतात पुरेसा तेल साठा आणि गॅससाठा असला तरी अनेक देशांत तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरू शकते.


होर्मूझ सामुद्रधुनीतील तणाव हा केवळ प्रादेशिक मुद्दा राहिलेला नसून जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. इतर देशांमध्ये या युद्धामुळे कोणतीही भीषण परिस्थिती जाणवू नये यासाठी भारतासह अनेक देश परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत

Comments
Add Comment

Supreme Court on Three-Language Policy : त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी; 'नववीपासून नवी भाषा म्हणजे विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण'

नवी दिल्ली : इयत्ता नववीपासून त्रिभाषा धोरण लागू करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी

Bay of Bengal Tragedy : बंगालच्या उपसागरात रोहिंग्यांच्या दोन बोटी उलटल्या; ५०० हून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची भीती

ढाका/यांगून : म्यानमारमधून पलायन करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट कोसळले आहे. बंगालच्या उपसागरात

Pimple Solution : चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात? 'या' सोप्या उपायांनी मिळवा स्वच्छ, नितळ त्वचा

पिंपल्स का

ISRO scientists resign : मोठी बातमी! गगनयानसारख्या मोहिमांवर काम करणाऱ्या १०० हून अधिक शास्त्रज्ञांनी सोडली 'इस्रो'; राजीनाम्यांचे नियम आता होणार कडक!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गगनयानसारख्या देशाच्या अत्यंत

Shri Jagannath Rath Yatra 2026 : आजपासून श्रीजगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ! २४ जुलैपर्यंत रंगणार भक्तिमय सोहळा; जाणून घ्या महत्त्व, परंपरा आणि संपूर्ण वेळापत्रक

पुरी (ओडिशा): सनातन धर्मातील सर्वात पवित्र आणि भव्य उत्सवांपैकी एक असलेल्या श्रीजगन्नाथ रथयात्रेला आज (१६ जुलै)

Kudankulam Nuclear Project : कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाची गोपनीय माहिती डार्क वेबवर

आराखडे, पुरवठादार आणि संवेदनशील कागदपत्रांसह १९ हजार फाईल्स उघड नवी दिल्ली : तमिळनाडू येथील कुडनकुलम भारताच्या