Vasai - Virar Crime : वसई–विरारमध्ये मृतदेह सापडण्यांची मालिका सुरूच; १५ दिवसांत ६ घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वसई-विरार : वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात मृतदेह सापडण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले असून, अवघ्या १५ दिवसांत सहा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रविवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्ग वरील विरार फाटा येथे सडलेल्या अवस्थेतील एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.



कचऱ्याजवळ सडलेल्या अवस्थेत मृतदेह


स्थानिकांना दुर्गंधी आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला असता कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक मृतदेह दिसून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. हा मृत्यू नैसर्गिक, अपघाती की घातपात, याचा तपास सुरू आहे.



१५ दिवसांत सहा मृतदेह


गेल्या दोन आठवड्यांत या परिसरात सापडलेल्या मृतदेहांची मालिका चिंताजनक आहे.


२१ मार्च : शिरवली येथे महिलेचा कुजलेला मृतदेह; पती अटकेत
२३-२४ मार्च : धानिवबाग येथे ६ वर्षीय बालिकेचा विहिरीत मृतदेह
२६-२७ मार्च : पेल्हार फाटा येथे शिरच्छेद अवस्थेत पुरुषाचा मृतदेह
मार्च अखेर : नालासोपारा पश्चिम येथे नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह
३०-३१ मार्च : फुलपाडा येथे अज्ञात इसमाचा मृतदेह
५ एप्रिल : विरार फाटा येथे सडलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह



नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


सतत उघड होत असलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. “गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. निर्जन भाग, अपुरी प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव यामुळे गुन्हेगारांना वाव मिळत असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत.



पोलिसांसमोर तपासाचे आव्हान


काही प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अनेक मृतदेहांची ओळख पटवणे अद्यापही आव्हानात्मक ठरत आहे. बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींचा आधार घेत तपास सुरू असून, या घटनांमागील सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


वसई–विरार पट्ट्यात सलग सापडणारे मृतदेह ही गंभीर बाब ठरत असून, या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडक उपाययोजना आणि देखरेख वाढवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये