नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू आहेत. या कामासाठी सातत्याने महामार्गावर टप्प्याटप्प्यात वाहतूक ब्लॉक घेतला जात आहे. त्यानुसार ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान १४ टप्प्यांत वर्धा आणि नागपूर दरम्यानच्या भागातील महामार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद राहणार आहे.


वर्धा येथील साखळी क्रमांक ५८.९ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. वर्धा येथील साखळी क्रमांक ५९.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. वर्धा येथील साखळी क्रमांक ६५.४ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ३१ जानेवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३१.५ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३७.७ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ३७.७ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक ४५.४ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ८.६ येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. हिंगणा, नागपूर येथील साखळी क्रमांक ८.६ येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक २ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.

Comments
Add Comment

मुलांचे 'डिजिटल व्यसन' सुटणार! राज्य सरकारकडून तज्ज्ञांची 'टास्क फोर्स' नियुक्त; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

मुंबई : मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाबाबत आणि त्याचा होणारा दुष्परिणाम लक्षात घेता याबाबत अभ्यास

मुंबईत २७,२८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा

Devendra fadanvis : मुंबईत आता 'AI' करणार प्रदूषणाचे मॉनिटरिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत

मुंबईहून मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास होणार सुसाट

मुंबई: मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही

मुंबई महापालिकेच्या शिक्षणविभागाच्या अर्थसंकल्पाचा आकार ४२४८ कोटींचा; शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सादर केला अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी?

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका चा सन २०२६-२७ या आर्थिक