वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्ज


विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. बहुजन विकास आघाडी आणि भाजप या दोनही राजकीय पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महापौर पदासाठी एकूण ४ जणांचे ७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या तीन नगरसेवकांनी आणि भाजप तर्फे एका सदस्याने अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी एकूण ३ जणांचे ५ अर्ज दाखल झाले आहेत. यात बविआतर्फे २ तर भाजपच्या एका नगरसेवकाने अर्ज दाखल केला आहे.


वसई-विरार महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. ११५ पैकी ७१ सदस्य त्यांचे निवडून आले असून त्यातील एका काँग्रेसच्या सदस्याला बविआचा पाठिंबा होता. तर भाजप- शिवसेना महायुतीचे ४४ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित आहे. महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीची आरक्षण देखील नुकताच जाहीर झाले असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे आरक्षण निघाले आहे. दरम्यान, शुक्रवारी महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने, निषाद चोरघे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. या तिघांनीही प्रत्येकी २ अर्ज दाखल करण्यात आले. तर भाजपतर्फे ॲड. दर्शना त्रिपाठी यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकूण ७ अर्ज पालिकेकडे दाखल झाले आहेत.तर दुसरीकडे उपमहापौर पदासाठी बविआतर्फे मार्शल लोपीस, कन्हैया भोईर यांनी प्रत्येकी २ अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी एक अर्ज दाखल केला असून एकूण ५ अर्ज सादर करण्यात आले आहेत. ३ फेब्रुवारी रोजी बविआतर्फे कोण अर्ज मागे घेणार आणि कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीने सदर निवडणूक अविरोध होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, की आणखी काही चमत्कारिक घडणार आहे हे ३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर