अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्तासंतुलन आणि मंत्रिमंडळातील खात्यांच्या पुनर्वाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावीत, अशी भूमिका मांडली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ आणि नियोजन, खाते तसेच उत्पादन शुल्क विभागाचा कारभार होता. ही सर्व खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावीत, असा आग्रह या बैठकीत नेत्यांनी धरल्याची माहिती आहे.

या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बारामती येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत पक्षाची पुढील दिशा, नेतृत्व आणि भविष्यातील राजकीय भूमिका याबाबत चर्चा झाली. त्यानंतर हे सर्व नेते मुंबईत दाखल होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले.


पक्ष नेतृत्त्वाबाबत घडामोडींना वेग


दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अधिक वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाची मागणी पुढे करत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी भूमिका जाहीरपणे मांडली. “सर्वांचीच मागणी आहे की वहिनींना मंत्रिपदी आणावे. ही जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा,” असे झिरवाळ यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यास ती अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि पवार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालू राहील, असेही त्यांनी नमूद केले.


अजित पवार यांच्या अचानक जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य, नेतृत्व कोणाकडे जाणार, तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, यासारख्या अनेक प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्यासारखा सर्वमान्य आणि प्रभावी नेता सध्या पक्षाकडे नसल्याने नेतृत्वाचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत पवार कुटुंबातीलच कुणी पुढे येणार की पक्षातील अन्य वरिष्ठ नेते ही जबाबदारी सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पार्थ आणि जय पवार राजकारणात येणार?

सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार असून त्या राज्याच्या सक्रिय राजकारणात परत येणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. याशिवाय अजित पवार यांची मुले पार्थ आणि जय पवार यांना भविष्यात पक्षाची अधिक जबाबदारी दिली जाणार का, यावरही चर्चा सुरू आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष आहे.
Comments
Add Comment

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

Tirupati laddu : तिरुपती लाडू भेसळ प्रकरण : सीबीआयकडून मोठा खुलासा; लाडूमध्ये 'बीफ टॅलो' किंवा प्राण्यांची चरबी नसल्याचे स्पष्ट

नेल्लोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने (CBI) आपला अंतिम आरोपपत्र (Chargesheet)

कूपर रुग्णालय परिसरातील २०० फेरीवाल्यांच्या वाढीव बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अंधेरी (पश्चिम) येथील राम गणेश गडकरी मार्ग (इर्ला मार्ग) परिसरातील सुमारे २०० अनधिकृत

ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी भाजप–महायुतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

ठाणे शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भाजप–महायुतीच्या भरघोस यशाच्या पार्श्वभूमीवर, ठाणे

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी अजित पवार होते सकारात्मक - जयंत पाटील; दोन्ही पक्षात अनेक गुप्त बैठका झाल्याचा दावा

मुंबई : अजित पवारांच्या मृत्यूपश्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाबाबत पुन्हा एकदा