Crime News :सोलापूरातील धक्कादायक घटना;बहिनीच्या पतीलाच...हॅाटेलमध्ये जेवायला बोलवलं अन्

सोलापूर : बहिणीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे या गोष्टीचा राग मनात ठेवून आपल्याच बहिणीच्या पतीला भावाने संपवल्याची घटना बार्शी तालुक्यात झाली आहे. बहिणीच्या पतीला बार्शी येथील हॅाटेलमध्ये जेवायला बोलावुन घेऊन व हॅाटेलमध्ये दारु पिताना झालेल्या वादातून बहिणीच्या पतीवर दारुची बॅाटल फोडून व गळ्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. हि घटना बार्शी तालुक्यातील पांगरी येथे बुधवारी २८ जानेवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.


नक्की घडलं काय ?


सुशील क्षीरसागर (वय २६, रा. अरणगाव, ता. बार्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुशील व रेश्मा यांचा वर्षभरापूर्वी कुटुंबाच्या विरोधात प्रेमविवाह झाला होता. या विवाहाचा राग रेश्माचा भाऊ ऋषिकेश याच्या मनात होता. सुशील वाहनचालक म्हणून काम करत होता, तर रेश्मा पुण्यातील एका खासगी दवाखान्यात कार्यरत होती. दोघे पुण्यात वास्तव्यास होते. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ते सोलापूर जिल्ह्यात आले होते. २८ जानेवारी रोजी ऋषिकेशने “सगळे मिळून हॉटेलवर जेवायला जाऊ” असे सांगून सुशील, रेश्मा, स्वतःची मैत्रीण काजल मिसाळ आणि मामा मच्छिंद्र चव्हाण यांना पांगरी येथील हॉटेल शिवनेरी येथे नेले. जेवणादरम्यान रेश्माच्या लग्नावरून “आपले आडनाव एकच असूनही हे लग्न कसे केले?” असा सवाल ऋषिकेशने केला. यावरून सुशील आणि ऋषिकेशमध्ये वाद झाला.


वाद विकोपाला गेल्यानंतर ऋषिकेशने हातातील दारूची काचेची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुशीलला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत बहिणीसमोरच तिच्या पतीचा जीव गेला असून, एका क्षणात तिचे कुंकू पुसले गेले. या प्रकरणी वैजिनाथ बंकट क्षीरसागर यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी ऋषिकेशला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राज्यातील 'आयटीआय' होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा! 'त्या' एका मिठीसाठी व्याकुळ झाला पुतण्या

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे

Maharashtra Goverment On Government Aircraft And Helicopters : राज्य सरकारचा मोठा निर्णय: सरकारी विमानांच्या देखभालीचा 'प्लॅन' तयार; 'जीआर' मध्ये काय?

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी विमानांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या कामांसाठी मोठा निधी