Crime News :सोलापूरातील धक्कादायक घटना;बहिनीच्या पतीलाच...हॅाटेलमध्ये जेवायला बोलवलं अन्

सोलापूर : बहिणीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे या गोष्टीचा राग मनात ठेवून आपल्याच बहिणीच्या पतीला भावाने संपवल्याची घटना बार्शी तालुक्यात झाली आहे. बहिणीच्या पतीला बार्शी येथील हॅाटेलमध्ये जेवायला बोलावुन घेऊन व हॅाटेलमध्ये दारु पिताना झालेल्या वादातून बहिणीच्या पतीवर दारुची बॅाटल फोडून व गळ्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. हि घटना बार्शी तालुक्यातील पांगरी येथे बुधवारी २८ जानेवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.


नक्की घडलं काय ?


सुशील क्षीरसागर (वय २६, रा. अरणगाव, ता. बार्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुशील व रेश्मा यांचा वर्षभरापूर्वी कुटुंबाच्या विरोधात प्रेमविवाह झाला होता. या विवाहाचा राग रेश्माचा भाऊ ऋषिकेश याच्या मनात होता. सुशील वाहनचालक म्हणून काम करत होता, तर रेश्मा पुण्यातील एका खासगी दवाखान्यात कार्यरत होती. दोघे पुण्यात वास्तव्यास होते. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ते सोलापूर जिल्ह्यात आले होते. २८ जानेवारी रोजी ऋषिकेशने “सगळे मिळून हॉटेलवर जेवायला जाऊ” असे सांगून सुशील, रेश्मा, स्वतःची मैत्रीण काजल मिसाळ आणि मामा मच्छिंद्र चव्हाण यांना पांगरी येथील हॉटेल शिवनेरी येथे नेले. जेवणादरम्यान रेश्माच्या लग्नावरून “आपले आडनाव एकच असूनही हे लग्न कसे केले?” असा सवाल ऋषिकेशने केला. यावरून सुशील आणि ऋषिकेशमध्ये वाद झाला.


वाद विकोपाला गेल्यानंतर ऋषिकेशने हातातील दारूची काचेची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुशीलला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत बहिणीसमोरच तिच्या पतीचा जीव गेला असून, एका क्षणात तिचे कुंकू पुसले गेले. या प्रकरणी वैजिनाथ बंकट क्षीरसागर यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी ऋषिकेशला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार