Crime News :सोलापूरातील धक्कादायक घटना;बहिनीच्या पतीलाच...हॅाटेलमध्ये जेवायला बोलवलं अन्

सोलापूर : बहिणीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे या गोष्टीचा राग मनात ठेवून आपल्याच बहिणीच्या पतीला भावाने संपवल्याची घटना बार्शी तालुक्यात झाली आहे. बहिणीच्या पतीला बार्शी येथील हॅाटेलमध्ये जेवायला बोलावुन घेऊन व हॅाटेलमध्ये दारु पिताना झालेल्या वादातून बहिणीच्या पतीवर दारुची बॅाटल फोडून व गळ्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. हि घटना बार्शी तालुक्यातील पांगरी येथे बुधवारी २८ जानेवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.


नक्की घडलं काय ?


सुशील क्षीरसागर (वय २६, रा. अरणगाव, ता. बार्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुशील व रेश्मा यांचा वर्षभरापूर्वी कुटुंबाच्या विरोधात प्रेमविवाह झाला होता. या विवाहाचा राग रेश्माचा भाऊ ऋषिकेश याच्या मनात होता. सुशील वाहनचालक म्हणून काम करत होता, तर रेश्मा पुण्यातील एका खासगी दवाखान्यात कार्यरत होती. दोघे पुण्यात वास्तव्यास होते. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ते सोलापूर जिल्ह्यात आले होते. २८ जानेवारी रोजी ऋषिकेशने “सगळे मिळून हॉटेलवर जेवायला जाऊ” असे सांगून सुशील, रेश्मा, स्वतःची मैत्रीण काजल मिसाळ आणि मामा मच्छिंद्र चव्हाण यांना पांगरी येथील हॉटेल शिवनेरी येथे नेले. जेवणादरम्यान रेश्माच्या लग्नावरून “आपले आडनाव एकच असूनही हे लग्न कसे केले?” असा सवाल ऋषिकेशने केला. यावरून सुशील आणि ऋषिकेशमध्ये वाद झाला.


वाद विकोपाला गेल्यानंतर ऋषिकेशने हातातील दारूची काचेची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुशीलला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत बहिणीसमोरच तिच्या पतीचा जीव गेला असून, एका क्षणात तिचे कुंकू पुसले गेले. या प्रकरणी वैजिनाथ बंकट क्षीरसागर यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी ऋषिकेशला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी