'संजय राऊत यांची ही तर गिधाडी वृत्ती..'; भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर

शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत हे गिधाडी वृत्तीचे आहेत, अशा शब्दांमधून भाजप प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शुक्रवार ३० जानेवरी रोजी मध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी भाजपावर आरोप केले. त्या आरोपांचे नवनाथ बन यांनी खंडन केले आहे.


संजय राऊत यांनी केलेल आरोप : 


अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, सरकारनं नाही तर भाजपनं हे करणं कौतुकास्पद आहे. पण, याच भाजपनं अजितदादांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि यातलं काही ते सिद्ध करू शकले नाहीत. थेट पंतप्रधानांनी हा आरोप केला. माझी विनंती आहे की दादांवर खरंच तुमचं इतकं प्रेम असेल तर त्यांच्यावर केलेले आरोप मागे घ्या हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल. ही माझी विनंती आहे, राजकीय मागणी नाही. यात राजकारण नाही. अजितदादा आपल्यात नाहीत, नुसती श्रद्धांजली वाहून उपयोग नाही, त्यांच्यावरील आरोप मागे घ्या' याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.


पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की; "अद्याप मुंबईचा महापौर निवडला जात नाही, तारखा पुढेपुढे जात आहेत. यांच्यामध्येच अजून मतभेद आहेत.  यात खूप वेळ वाया जात आहे. हे असं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये? नगरसेवक निवडून आले आहेत त्यांना पालिकेत येऊ दे, कार्यकाळ सुरू होऊदेत . मात्र भाजप आणि शिंदे गटामध्ये मनपा सत्तेचं वाटप अडकून पडलं आहे."


राज्याची जनता त्यांना चांगला धडा शिकवेल : 


त्यांच्या या आरोपांवर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नवनाथ बन म्हणाले की; अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असतांना त्यांच्या नावाने राजकारण करणे ही 'गिधाडी' वृत्ती आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या लाडक्या दादांना निरोप देत असतांना सिंचन घोटाळ्याचा विषय काढण्याची काही गरज नव्हती. संजय राऊत अजितदादांच्या निधनावरही नीच राजकारण करत आहेत, राज्याची जनता त्यांना चांगला धडा शिकवेल.


मित्रांच्या पाठीमागे खंजीर खुपसणाऱ्यांनी मैत्रीवर बोलू नये : 


पुढे बोलतांना नवनाथ बन म्हणाले की; अजित पवार यांच्या श्रद्धांजली जाहिरातीवर संजय राऊत यांनी आक्षेप घेणे हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. भाजपाने आपल्या मित्राला श्रद्धांजली दिली म्हणून राऊत यांच्या पोटात दुखत आहे. मित्रांच्या पाठीमागे खंजीर खुपसणाऱ्यांनी मैत्रीवर बोलू नये. संपूर्ण महाराष्ट्र शोकात असताना राऊत मात्र सगळ्यांना सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत होते, हे चुकीचे आहे. चितेचा अग्नि शांत होण्याच्या आधीच संजय राऊत यांच्याकडून राजकारण सुरू झाले आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. जाणीवपूर्वक अजितदादांना बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. राजकारण करण्यासाठी त्यांना पूर्ण ३६० दिवस असूनही त्यांना मात्र या चार - पाच दिवसांमध्येच राजकारण करायचे आहे.


महापौर हा महायुतीचाच होणार : 


राऊत यांच्या महापौर निवडीच्या टीकेवर उत्तर देतांना नवनाथ बन म्हणाले की; महापौर हा महायुतीचाच होणार याबद्दल अजिबात शंका नाही. आमच्यात अजिबात रस्सीखेच नाही आहे. आमचं पहिल्या दिवसापासून ठरलं आहे की महापौर हा महायुतीचाच, आणि मराठीच होणार. मात्र सध्या शासकीय दुखवट्यामध्ये हा निर्णय घेण योग्य नाही. पुढच्या आठवड्यात योग्य वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याचा निर्णय घेतील.
Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या