वरळी कोस्टल रोडवर उभारणार मुंबईतील तिसरा हेलिपॅड; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : वरळीत मुंबईच्या कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅडची सुविधा उभारण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी राजभवन, महालक्ष्मी रेसकोर्स आणि आता कोस्टल रोड हा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.


वरळी येथे उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक हेलिपॅडचे संचालन आणि देखभालसाठी महापालिकेने कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर केली जाणार आहे.


वरळीमध्ये समुद्रात १०० मीटर अंतरावर असलेल्या जेट्टीवर हे अत्याधुनिक हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. हे हेलिपॅड दक्षिण मुंबईतील पहिलेच सरकारी मालकीचे सार्वजनिक हेलिपॅड असणार आहे.


हेलिपॅड चालवण्याचे कंत्राट सुरवातीला पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंत्राटदाराने पालिकेला ठराविक मासिक परवाना शुल्क आणि प्रत्येक लँडिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा द्यावा लागेल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.



हेलिपॅडचे वैशिठ्ये


या हेलिपॅड चे वैशिष्ठ्ये म्हणजे, आपत्कालीन काळात रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी या हेलिपॅडचा वापर प्राधान्याने केला जाणार आहे. तसेच किनारपट्टीची सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनेसाठी कोस्टल पोलीस व सुरक्षा दलांना हे केंद्र फायदेशीर ठरणार आहे. सरकारी तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी देखील याचा फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून

Rejuvenation of rivers : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना

मुंबई : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य

आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस

चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी' मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस