आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस

चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी'


मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस पडताना दिसला. गेल्या चार दिवसांत मंत्रालयातील विविध विभागांनी तब्बल ९५१ शासन निर्णय (जीआर) निर्गमित करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे, शनिवार-रविवार आणि महावीर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असतानाही प्रशासन पूर्णवेळ कार्यरत होते.


३१ मार्च रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा निधी व्यपगत (लॅप्स) होऊ नये, यासाठी प्रस्तावांवर मान्यतेची मोहोर उठवण्याचा सपाटा मंत्रालयात पाहायला मिळाला. सुट्टीच्या दिवशी, मंगळवारी एका दिवसात २६७ जीआर प्रसिद्ध करण्यात आले. या काळात मंत्री, त्यांचे खासगी सचिव, विविध विभागांचे सचिव आणि कर्मचारी मंत्रालयात तळ ठोकून होते. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापूर्वी प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी ही प्रशासकीय तत्परता दाखवण्यात आली.


मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शनिवार, रविवार आणि मंगळवार अशा तीन सुट्ट्या आल्या होत्या. केवळ सोमवार हा कामकाजाचा दिवस होता. मात्र, 'मार्च एंड'चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वच विभागात कर्मचारी हजर होते. अनेक विभागांमध्ये रात्री उशिरापर्यंत शासन निर्णय पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू होते.



कोणी किती जीआर काढले?


- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग - १२२
- दिव्यांग कल्याण विभाग - १००
- शालेय शिक्षण विभाग - ८५
- मृद व जलसंधारण विभाग - ६५
- महसूल व वन विभाग - ६४
- उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग - ६१
- सहकार व वस्त्रोद्योग विभाग - ५३
- गृह विभाग - ४१
- कृषी विभाग - ३५
- सार्वजनिक आरोग्य विभाग - ३५
- अल्पसंख्याक विकास विभाग - १४



का झाली ही घाई?


सरकारी नियमांनुसार, मंजूर झालेला निधी ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत खर्च न झाल्यास तो पुन्हा सरकारी तिजोरीत जमा होतो. अनेक विकासकामे, योजनांचे अनुदान आणि कंत्राटदारांची देयके अदा करण्यासाठी शासन निर्णय काढणे अनिवार्य असते. हा निधी वाचवण्यासाठी आणि नवीन वर्षात कामांना गती देण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत 15 दिवसांत अहवाल सादर करा

 मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गोपाळगड

Mumbai Crime: मुंबईत खळबळ! RTO कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ACB च्या जाळ्यात; 4 हजारांची लाच घेताना अटक

Crime News: सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील वांद्रे प्रादेशिक

अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

मुंबई  : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक

वसई-विरारकरांसाठी मोठी खुशखबर! मेट्रो १३ मार्गिकेचा नवा आराखडा तयार, प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रो (Metro) नेटवर्कचा विस्तार

विश्वासात घेतलं, घरात प्रवेश मिळवला अन् 25 लाखांचा डल्ला! अभिनेत्री रवीना टंडनच्या कुटुंबाला मोठा धक्का

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबाचा विश्वास

BMC News : वरळीतील कोस्टल रोडवरील लोटस जेट्टी ते समुद्र महालपर्यंत नवीन विहारपथ

- ‘मिसिंग लिंक’ पूर्ण करण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या