सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात बिबट्याचा वावर

सुधागड-पाली  : सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आणि त्याच्या पिल्लांच्या दर्शनामुळे परिसरात दहशत पसरली आहे. त्यामुळे वन विभागाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध ठिकाणी जनजागृतीचे फलक लावण्यात येत आहेत. सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे. म्हैस शोधण्यासाठी गेलेल्या शेतकरी गणपत बरगे यांचा बिबट्याशी आमनासामना झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. वनविभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली असून, पाच्छापूर गावात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच, नागरिकांना सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. शनिवारी (दि.२४) वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पाच्छापूर येथे पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे बसवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जाईल आणि आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे यांनी सांगितले की, "बिबट्याचा वावर परिसरात असल्याने आम्ही ट्रॅप कॅमेरे बसवून हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. वनविभाग परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून आवश्यक ती उपाययोजना करत आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडून तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता विभागाने ट्रॅप कॅमेरे बसवून आणि सतत निरीक्षण ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पाच्छापूरसह आजूबाजूच्या आसानवाडी, पोटलज आणि धोंडसे या गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. याची दखल घेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी देऊन पगमार्क्सची पाहणी केली. तसेच बिबट्याशी सामना झाल्यास काय करावे, याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.गावातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी माहितीपर फलक लावून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

इराणशी लढण्याआधी अमेरिकेच्या सैनिकांमध्ये भर समुद्रात टॉयलेटवरून मारामारी

वाशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अमेरिकेने आपल्या युद्धनौका

President Draupadi Murmu: राष्ट्रपती २५ फेब्रुवारी रोजी करणार राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

अकोला :  भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २८

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील