भारताचा विकास दर ७% राहणार - मुख्य आर्थिक सल्लागार

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी संसदेत अर्थसंकल्पपूर्व सर्वेक्षण २०२५-२६ सादर केले आहे. ज्यावर आधारित भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची संभाव्य ७% पातळीवर पोहोचला असे म्हटले आहे. मुख्य आर्थिक सल्लागार डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांनी अर्थसंकल्प पूर्व भाषणत संबोधित करताना अधोरेखित केले आहे की, 'भारताचा संभाव्य विकास दर तीन वर्षांपूर्वीच्या ६.५% वरून वाढून ७% पर्यंत पोहोचला आहे. नवी दिल्लीत आर्थिक सर्वेक्षण २०२५-२०२६ संदर्भात माध्यमांशी बोलताना नागेश्वरन म्हणाले की, कोविड-पूर्व काळात वास्तविक जीडीपी वाढ ६.४ टक्के होती, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ती ६.५% होती आणि या वर्षी ती ७.४% राहण्याचा अंदाज आहे. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या वर्षीच्या ७.२% च्या वाढीनंतर या वर्षी खाजगी अंतिम उपभोग खर्चात ७% वाढ झाली आहे. याशिवाय नागेश्वरन म्हणाले की, अत्यंत मध्यम महागाईच्या वातावरणातही देश उच्च विकास दर (High Growth Rate), उपभोग (Consumption) आणि गुंतवणुकीवरील खर्च यशस्वीपणे साध्य करत आहे.


संसदेत सादर केलेल्या अहवालात भारताचा विकास दर ७% संभाव्य दरात पोहोचेल असे म्हटले होते. तर रिअल जीडीपी दर ७.४% प्रस्तावित असेल असे सर्वेक्षणात नमूद केले होते. रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर संसदेत सादर करणार आहेत. कालपासूनच राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्प सत्राची सुरुवात झाली होती. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पुढील महिन्याच्या १३ तारखेपर्यंत चालणार आहे. दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकूण ३० बैठका होणार आहेत.

Comments
Add Comment

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

Rohit Shetty : रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! २० कोटींच्या खंडणीची मागणी; बिश्नोई गँगचं कनेक्शन तपासात

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

US-Iran War : अमेरिकेचा इराणवर सलग दुसऱ्या दिवशी हल्ला; बहरीन-कुवेतमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन, मध्य-पूर्वेत युद्धजन्य तणाव

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका व्यापारी तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर मध्य-पूर्वेतील तणाव