Ajit Pawar Passed Away : "परत या, परत या... अजितदादा परत या"; पार्थिव उचलताच कार्यकर्त्यांचा आक्रोश

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी आपल्या लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून "परत या, परत या ... अजितदादा परत या", "थांबा! आमच्या दादांना नेऊ नका, आम्ही पाया पडतो" अशा शब्दांमध्ये आक्रोश सुरू आहे.  संपूर्ण वातावरणात शोककळा पसरली आहे. सर्वांना आपले अश्रू थांबवून ठेवणं कठीण झालं आहे.


बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामती विमानतळावर दाखल झाले तेव्हा वातावरण भावुक झालं होतं.


राजकारणातील आक्रमक चेहरा ते सामान्यांचा 'हक्काचा दादा' असा अजित पवार (Ajit Pawar) यांचा प्रवास एका वळणावर येऊन थांबला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या कार्यशैलीत आणि प्रतिमेत केलेला बदल हा राज्यासाठी कौतुकाचा विषय ठरला होता. केवळ सत्तेचे राजकारण न करता, लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज त्यांच्या आठवणींना अधिक गडद करत आहे. अजित पवार यांनी अलीकडच्या काळात महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले होते. या नव्या नात्याचे प्रतीक म्हणून त्यांनी स्वीकारलेला 'गुलाबी रंग' हा केवळ कपड्यांपुरता मर्यादित नव्हता, तर तो त्यांच्या मृदू आणि सर्वसमावेशक प्रतिमेचा भाग बनला होता. राजकीय डावपेचांपलीकडे जाऊन त्यांनी स्वीकारलेली ही नवीन 'इमेज' आज त्यांच्या निधनानंतर समर्थकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. रणनीती बदलून जनतेच्या अधिक जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. आपल्या लाडक्या नेत्याची ही 'गुलाबी स्वप्नं' आणि विकासाची धडाडी आता केवळ आठवणींच्या रूपात जनतेच्या मनात जिवंत राहणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली'च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

पुणे - सासवड, दि. १२ जुलै - अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Girija Raut Case : खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; निष्पक्ष चौकशीची मागणी

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना