बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच अपघातात अजित पवार यांचे सुरक्षारक्षक पोलीस हवालदार (पर्सनल सेक्युरिटी ऑफीसर, पीएसओ) विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. ते ४३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी संध्या (३८), मुलगी नेत्रा (१४) आणि मुलगा अद्वीत (१०) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ते वास्तव्याला असलेल्या ठाण्यातील विटावा भागात शोककळा पसरली आहे. राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळेच मंत्री अजित पवार यांचा बुधवारी बारामती दौरा होता. याच दौऱ्यामध्ये मुंबई पोलीस दलातील हवालदार जाधव यांचीही त्यांच्यासमवेत पीएसओ म्हणून डयूटी होती. बुधवारी सकाळी ८.१० चे विमानाचे मुंबईतून टेक ऑफ असल्यामुळे जाधव यांना मुंबईत ५.३० वाजता पोहोचायचे होते. ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी मंगळवारी खारीगाव येथील त्यांच्या सासूरवाडीमध्ये गेले होते. तिथूनच ते बुधवारी पहाटे ४ वाजता डयूटीसाठी रवाना झाले. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचीच माहिती समजताच जाधव यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. जाधव हे विटावा येथील सूर्यानगर परिसरातील साई कृष्ण विहार इमारतीच्या बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरड गावचे ते रहिवासी होते. विदीप यांच्या निधनाची माहिती समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

Comments
Add Comment

MUMBAI WEATHER : मुंबई हवामान अपडेट: मान्सूनची चाहूल, शहरात पावसाची शक्यता

MUMBAI : मान्सूनच्या आगमनासोबतच मुंबई आणि परिसरात हवामानात बदल जाणवू लागला आहे. आज, ७ जून रोजी शहरात आकाश अंशतः ढगाळ

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष