Ajit Pawar Passed Away : ओह शिट..! अजित पवारांचे विमान कोसळण्याआधी पायलटचे शेवटचे शब्द

मुंबई : बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताच्या काही क्षण आधी कॉकपिटमध्ये नेमके काय घडले, याबाबतची माहिती आता समोर येऊ लागली आहे. विमान कोसळण्याआधी वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनी उच्चारलेले “ओह शिट… ओह शिट” हे शेवटचे शब्द या अपघाताची भीषणता अधोरेखित करणारे ठरत आहेत.


उपलब्ध माहितीनुसार, विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांच्या हातात होती. सकाळच्या वेळेस धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. वैमानिकांनी बारामती विमानतळाच्या रनवे क्रमांक ११ वर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याने त्यांनी विमान पुन्हा वर घेतले. यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विमान रनवेच्या दिशेने सरकले, मात्र धावपट्टीला स्पर्श करण्याआधीच विमानाचा तोल गेला, ते उलटले आणि जमिनीवर जोरात आदळले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

- बारामती विमानतळाजवळील परिसरात वस्ती असल्याने अनेकांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान धावपट्टीपासून सुमारे १०० फूट आधीच कोसळले. विमान खाली उतरत असताना अपघात होणार, अशी भीती वाटत होती आणि तसेच घडले. धावपट्टीवर आदळताच विमानात मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. त्यानंतर सलग चार ते पाच स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले.
- अपघातानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. विमानातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणालाही मदत करता आली नाही. काही गावकऱ्यांनी सांगितले की, स्फोटानंतर विमानाचे तुकडे उडून थेट घरांपर्यंत येऊन पडले.
- आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान आधी गावावरून गेले आणि नंतर खाली उतरताना दिसले. त्यानंतर ते धावपट्टीकडे गेले, उलटले आणि जमिनीवर आदळले. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात आगीचे लोळ उठले होते.


विमानातील प्रवासी


१. उपमुख्यमंत्री अजित पवार
२. मुंबई पीएसओ हवालदार विदीप जाधव
३. पायलट कॅप्टन सुमित कपूर
४. कॅप्टन शांभवी पाठक
५. पिंकी माळी, फ्लाइट अटेंडंट



Comments
Add Comment

Summer Vacation : शाळा सुटली, उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यातील उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या तापमानात विद्यार्थी शाळेत येण्याच्या निमित्ताने

Banks Closed : मे महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

मुंबई : मे 2026 महिन्यात देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, विविध सण, राष्ट्रीय आणि

Mira-Bhayandar terror scare : आरोपी जुबैर ‘जिहाद’च्या नावाखाली हिंदूंवर हल्ला करू इच्छित होता- मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, मीरा रोड येथे झालेला संशयित ‘लोन वुल्फ’

Mantralaya : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या

Devendra Fadanvis : शिवरायांच्या नावावर निरर्थक वाद उकरून काढणे संतापजनक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आक्षेप घेणाऱ्यांनी 'शिवाजी कोण होता?' पुस्तक वाचले का? मुंबई : "छत्रपती शिवाजी

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत नवा फॉर्म्युला

दंडात्मक कारवाईला तूर्तास ब्रेक; १ मेपासून राज्यव्यापी मोहीम, चालकांना सहा महिन्यांचा 'दिलासा' मुंबई : राज्यातील