उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाने गौतम अदानींनी शोककळा व्यक्त केली

मुंबई:अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी बुधवारी बारामतीजवळ झालेल्या अजितदादांसह सहा व्यक्तींच्या अपघातावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'एक्स' वर पोस्ट करत त्यांनी महिनाभरापूर्वी बारामतीमध्ये झालेल्या भेटीची आठवण करून दिली असून त्यांनी राष्ट्र व राज्याच्या उभारणीसाठी असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल पोस्टमध्ये उद्देशून म्हटले आहे. या पोस्टवर लिहिताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने खूप दुःख झाले.अवघ्या एका महिन्यापूर्वी, आम्ही बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआयच्या उद्घाटनासाठी एकत्र उभे होतो तो क्षण अजितजींची दूरदृष्टी, प्रगतीवरील त्यांचा विश्वास आणि भारताच्या तरुणाई व भविष्याप्रती त्यांची वचनबद्धता दर्शवणारा होता' असे गौतम अदानी म्हणाले आहेत.


पुढे, 'भविष्यासाठी सज्ज महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी सुरू ठेवलेल्या कार्याला पुढे नेऊन आपण त्यांच्या कार्याचा सन्मान करूया. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.आज सकाळी ८.४६ वाजता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पवार आणि इतर चार जणांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या मृत्यूंची पुष्टी केली. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार एका जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून बारामतीला प्रवास करत होते. दरम्यान तांत्रिक कारणामुळे बारामतीजवळ उतरत हा मोठा अपघात झाल्याने अजित पवारांचा जागीच मृत्यू झाला. विमान मुंबईहून उड्डाण केल्यानंतर सुमारे एका तासाने हा अपघात झाला. बारामती येथील घटनास्थळी आपत्कालीन सेवा आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. लँडिंगच्या वेळी विमानाचा ताबा सुटल्यानंतर तात्काळ बचाव पथके तैनात करण्यात आली.


शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांना 'सामान्य जनतेचे नेते, ज्यांचा तळागाळातील लोकांशी घट्ट संबंध होता' असे म्हटले होते तसेच 'प्रशासकीय बाबींची त्यांची समज आणि गरीब व वंचितांना सक्षम करण्याची त्यांची तळमळही उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या संवेदना' असे पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट केले होते.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. अजित पवार यांचे अकाली निधन ही एक कधीही भरून न येणारी हानी आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, विशेषतः सहकार क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना नेहमीच स्मरणात ठेवले जाईल असे राष्ट्रपतींनी एक्सवर म्हटले होते. गेल्या महिन्यात बारामतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे उद्घाटन करताना गौतम अदानी यांच्यासह शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे व इतर मान्यवर व दिग्गज नेते उपस्थित होते. त्याच धर्तीवर गौतम अदानी यांनी यावेळी झालेल्या घटनेनंतर शोककळा व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

'एस.टी'च्या ताब्यातील १ हजार ५०० हेक्टर जमिनींचा विकास करून महसूल वाढवणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती; प्रवाशांना आधुनिक सुविधा आणि स्थानिकांना रोजगार देणार मुंबई :

FIFA 2026 : फिफा २०२६ च्या विश्वचषकातून इराण बाहेर; फिफाने ठोठावला इराणला दंड

- या भ्रष्ट राजवटीने आमच्या नेत्याची हत्या केली, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात सहभागी होऊ शकत

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

भारतीय तेलवाहक जहाजांचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास सुरू

तेहरान : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी फोनवरून चर्चा

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

IPL 2026 : आयपीएल२०२६ पर्वाचे वेळापत्रक जाहीर; आरसीबी आणि एसआरएचमध्ये होणार सलामीची लढत

आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९ व्या