Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचा 'दादा' हरपला! उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६ जणांचा दुर्दैवी अंत; शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

बारामती : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.



अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय घडले?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांचे छोटे विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच शेजारील एका शेतात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA (नागरी विमान वाहतूक संचालनालय) कडून देण्यात आली आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामती येथील प्रचारसभांसाठी आपल्या खासगी विमानाने रवाना झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक (PA) देखील विमानात उपस्थित होते. विमान बारामती विमानतळाच्या जवळ पोहोचले असता, लँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान थेट एका शेतात कोसळले. सुरुवातीला अजित पवार आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. दुर्दैवाने, DGCA च्या ताज्या अहवालानुसार या अपघातात विमानातील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण बारामती शहर आणि परिसरात सध्या तणावाचे आणि दुःखाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून या अपघाताच्या कारणांचा सखोल तपास केला जात असून, पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Pune Crime: पुणे पोलिसांच्या सर्च मोहिमेला मोठे यश; ११ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी बुधवार १८ फेब्रुवारीच्या रात्री विशेष सर्च मोहीम राबवत मोठी

Cotton Procurement Scheme: मुख्यमंत्र्यांकडून कापूस खरेदी योजनेला मुदतवाढ; खुल्या बाजारात दर कोसळण्याची भीती

अकोला: शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र आणि राज्य

ST Bus: वर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार; तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात होणार दाखल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम विश्वास दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली

AI for Agri 2026: एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

२२ आणि २३ फेब्रुवारी रोजी होणार मुंबईत एआय फॉर अॅग्री २०२६ जागतिक परिषद “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून

Mumbai Metro: मुंबई मेट्रोसंदर्भातील मोठी अपडेट समोर; तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना...

मुंबई: मुंबई मेट्रोसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रोमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक

India AI Impact Summit 2026: मोठा दृष्टीकोन ठेवत एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशाची नवीन पिढी वेगाने कृत्रिम बुद्धीमत्तेला म्हणजेच 'एआय'ला स्वीकारत असून ही अत्यंत अभिमानाची बाब