Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका


मुंबई : मुंबईच्या वेशीवर असलेल्या मीरा-भाईंदर शहराला जोडणारी महत्त्वाकांक्षी ‘मेट्रो-९’ मार्गिका अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. दहिसर (पूर्व) ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातून धावणारी ही पहिली मेट्रो सेवा ठरली असून, यामुळे दहिसर चेकनाक्यावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे.


दहिसर (पूर्व) मेट्रो स्थानक येथे आयोजित या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्यासह मेट्रो प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रोतून प्रवास करत सुविधांचा आढावा घेतला.


मेट्रो मार्गिका ९ ही दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर दरम्यान १०.५ किमी लांबीची उन्नत मार्गिका आहे. यातील पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशिगाव दरम्यान ४.७ किमीचा मार्ग सुरू झाला आहे. यात दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव या चार स्थानकांचा समावेश आहे. या सेवेमुळे दहिसर टोल प्लाझा येथील वाहतूक कोंडी १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, रस्त्यावरील साधारण २० ते ३० टक्के प्रवासी मेट्रोकडे वळल्यास पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ताण हलका होण्यास मदत होईल.



'मल्टी मोडल' प्रणाली


ही मेट्रो मार्गिका दहिसर (पूर्व) येथे मेट्रो-७ (दहिसर ते अंधेरी) आणि पुढे ७-अ (विमानतळ जोडणी) च्या माध्यमातून 'रेड लाईन'शी जोडली गेली आहे. यामुळे मीरा-भाईंदरमधील रहिवाशांना थेट मुंबई विमानतळापर्यंत अखंड प्रवास करणे शक्य होणार आहे. बस आणि ऑटोरिक्षा यांच्याशी असलेल्या 'मल्टी मोडल' एकात्मिकरणामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागणार नाही.



पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवास


या मेट्रोमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणा जोडण्यात आली आहे. यामुळे गाड्यांच्या ब्रेकमुळे निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा वापरली जाणार असून, यामुळे विजेची मोठी बचत होईल. इलेक्ट्रिक मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. स्थानकांवर लिफ्ट, सरकते जिने, सीसीटीव्ही यंत्रणा आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष स्पर्शक्षम मार्गांची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण प्रणालीवर रिअल-टाइम देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीकृत नियंत्रण कक्ष कार्यरत राहील.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा