Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक प्रवासी बस आणि पिकअप ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत सीआरपीएफ (CRPF) जवानासह एकूण चार जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




 मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूर परिसरात बस आणि पिकअप ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सीआरपीएफच्या १३७ व्या बटालियनचे सेकंड-इन-कमांड करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ५२ व्या बटालियनच्या एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले आणि मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, डोडा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी खराब हवामानामुळे लष्कराचे वाहन घसरून झालेल्या अपघातात जवान रिंकिल बालियान यांच्यासह नऊ सैनिक शहीद झाले होते. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज भाजप खासदार अरुण गोविल आणि भाजप नेते संजीव बालियान यांनी शहीद रिंकिल बालियान यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी शहीद जवानाच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. कठीण प्रसंगात सरकार आणि पक्ष शहीद कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही यावेळी नेत्यांनी दिली.

Comments
Add Comment

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात