मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्रातून ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी केंद्राने २६९६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तूर खरेदी ही मूल्य समर्थन योजनेंतर्गत किमान आधारभूत किमतीनुसार होणार आहे.


केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल आणि थेट खरेदीमुळे दलालांचा त्रासही संपणार आहे. पारदर्शक खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.


केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे विपणन अर्थात मार्केटिंग विभागाचे मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. त्यांनी राज्यातील तूर उत्पादनाची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. तसेच बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांशी खरेदी प्रक्रियेच्या नियोजनाबाबत चर्चा केली.


केंद्राच्या निर्णयानुसार तूर खरेदी ही नाफेड आणि एनसीसीएफ या दोन केंद्रीय संस्था महाराष्ट्र शासनाशी समन्वय राखून करतील. गरज पडल्यास खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देशही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Comments
Add Comment

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

भारताचा शेषनाग १५० ड्रोन, नवं घातक शस्त्र

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत