इंडिगोचे ७१७ फेऱ्या रद्द

इतर एअरलाईनला संधी


नवी दिल्ली : डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या उड्डाण गोंधळानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईनवर कारवाई केली आहे. प्रवाशांच्या मोठ्या गैरसोयीची दखल घेत डीजीसीएने इंडिगोचे हिवाळी वेळापत्रक १० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले असून, त्यामुळे एअरलाईनला काही सेवा रद्द कराव्या लागल्या आहेत. या निर्णयानुसार इंडिगोने मंत्रालयाकडे ७१७ रिकाम्या स्लॉटची यादी सादर केली आहे.


मागील वर्षी ३ ते ५ डिसेंबरदरम्यान इंडिगोची अंदाजे अडीच हजारांहून अधिक उड्डाणे रद्द झाली होती, तर जवळपास दोन हजार उड्डाणांना विलंब झाला होता. यामुळे देशभरातील लाखो प्रवाशांना विमानतळांवर तासंतास वाट पाहावी लागली आणि मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. या गंभीर व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने ही कठोर कारवाई केली.


स्लॉट म्हणजे विमानाला विमानतळावर उतरण्यासाठी आणि उड्डाणासाठी दिलेला निश्चित वेळ असतो. इंडिगोने रिकामे केलेल्या ७१७ स्लॉटपैकी ३६४ स्लॉट दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळूरु आणि हैदराबाद या सहा प्रमुख मेट्रो विमानतळांवर आहेत. यामध्ये हैदराबाद आणि बंगळूरु येथे सर्वाधिक स्लॉट उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हे स्लॉट जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी रिकामे करण्यात आले आहेत.


या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण मंत्रालयाने तात्काळ हालचाली सुरू करत इतर विमान कंपन्यांकडून या स्लॉटसाठी अर्ज मागवले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि हवाई सेवा सुरळीत ठेवण्यासाठी इतर एअरलाईन्सनी या रिकाम्या स्लॉटचा वापर करावा, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे येत्या काळात काही मार्गांवर इतर विमान कंपन्यांच्या अतिरिक्त उड्डाणांची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

महाराष्ट्र 'पद्म'मय, 'पद्मविभूषण'सह १५ पुरस्कारांवर राज्याची मोहोर

धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण , अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण'तर रोहित शर्माला 'पद्मश्री' तारपा सम्राट'

पद्म पुरस्कारांची घोषणा, केरळच्या तिघांना पद्मविभूषण तर कोश्यारी आणि शिबू सोरेनना पद्मभूषण पुरस्कार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. केंद्राने २०२६ साठी

पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, आर्मिडा फर्नांडिस आणि श्रीरंग लाड यांना पद्मश्री

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने २०२६ च्या ४५ पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची