मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूत वाढ

उच्च न्यायालयाची केंद्र व राज्य सरकारांना नोटीस


भोपाळ : मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूत चिंताजनक वाढ झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून वन व पर्यावरण विभागांसह राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला (एनटीसीए)ही नोटीस पाठवण्यात आली आहे.


वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. याचिकेनुसार, २०२५ मध्ये मध्य प्रदेशात एकूण ५४ वाघांचा मृत्यू झाला असून ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू झाल्यापासून एका वर्षातील ही सर्वाधिक संख्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापैकी निम्म्याहून अधिक मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.


याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, सध्या जगात एकूण ५,४२१ वाघ असून त्यापैकी ३,१६७ वाघ भारतात आहेत. भारतातील सुमारे २५ टक्के म्हणजेच ७८५ वाघ मध्य प्रदेशात असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘टायगर स्टेट’ म्हणून ओळख असतानाही राज्यात वाघ मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे आकडे समोर आले आहेत. यापूर्वी २०२२ मध्ये ४३, २०२३ मध्ये ४५ आणि २०२४ मध्ये ४६ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याचिकेनुसार, या मृत्यूंपैकी सुमारे ५७ टक्के मृत्यू मानव-वन्यजीव संघर्ष, वीजेचा धक्का (इलेक्ट्रोक्युशन) किंवा इतर अज्ञात अनैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.


याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आदित्य सांघी आणि अलका सिंग यांनी न्यायालयात बाजू मांडली. दरम्यान, वाघांच्या शिकारीसंदर्भातील दुसऱ्या याचिकेत न्यायालयाने आदित्य सांघी यांची ‘अमिकस क्युरी’ (न्यायालय मित्र) म्हणून नियुक्ती केली आहे. दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात येणार असून पुढील सुनावणीमध्ये सरकारकडून सविस्तर अहवाल सादर करण्याची अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Amazon CEO Andy Jassy : ॲमेझॉनची भारतात २०३० पर्यंत ४८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार; अँडी जेसी यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर केली घोषणा

नवी दिल्ली : जगातील आघाडीची ई-कॉमर्स आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ॲमेझॉनने गुरुवारी भारतात २०२६ ते

Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर थरारक प्रसंग! एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने आली समोरासमोर; मोठा अपघात टळला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर बुधवार २४ जून रोजी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली

Air India Plane : एअर इंडियाचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) च्या विमानासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे

Indian Passport : पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी; MEA ने नागरिकत्वाबाबत दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट (Indian Passport) हा नागरिकत्वाचा (Citizenship) पुरावा नसून तो केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International Travel)

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी