राज्यपालांविरोधात ‘सर्वोच्च’मध्ये जाण्याची सिद्धरामय्या यांची तयारी

कर्नाटकातही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळला


नवी दिल्ली  : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राज्य विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषणातील केवळ दोन ओळी वाचल्या आणि ते सभागृहातून निघून गेले. यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या नाराज झाले असून त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी भाषणाच्या सुरुवातीला सर्व सदस्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी हिंदीत दोन ओळी वाचल्या. ‘माझे सरकार राज्याच्या आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासाचा वेग दुप्पट करण्यास कटिबद्ध आहे. जय हिंद, जय कर्नाटक’, इतके वाचून राज्यपाल यांनी सभात्याग केला. यानंतर काँग्रेस सदस्यांनी नाराजी व्यक्त करत राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. तामिळनाडू नंतर कर्नाटक राज्याचाही राज्यपालांशी असलेला संघर्ष उघड झाला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सभागृहात भाषणाला मंजुरी देण्याआधी ११ उतारे हटविण्यास सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मंत्रिमंडळाने त्यास नकार दिला होता.

Comments
Add Comment

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद