राज्यपालांविरोधात ‘सर्वोच्च’मध्ये जाण्याची सिद्धरामय्या यांची तयारी

कर्नाटकातही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळला


नवी दिल्ली  : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राज्य विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषणातील केवळ दोन ओळी वाचल्या आणि ते सभागृहातून निघून गेले. यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या नाराज झाले असून त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी भाषणाच्या सुरुवातीला सर्व सदस्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी हिंदीत दोन ओळी वाचल्या. ‘माझे सरकार राज्याच्या आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासाचा वेग दुप्पट करण्यास कटिबद्ध आहे. जय हिंद, जय कर्नाटक’, इतके वाचून राज्यपाल यांनी सभात्याग केला. यानंतर काँग्रेस सदस्यांनी नाराजी व्यक्त करत राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. तामिळनाडू नंतर कर्नाटक राज्याचाही राज्यपालांशी असलेला संघर्ष उघड झाला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सभागृहात भाषणाला मंजुरी देण्याआधी ११ उतारे हटविण्यास सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मंत्रिमंडळाने त्यास नकार दिला होता.

Comments
Add Comment

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या