पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी


दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इटाहारमध्ये सखोल मतदान पुनरावलोकन (एसआयआर / SIR / Special Intensive Revision) संदर्भातील तणाव आणि हिंसात्मक परिस्थिती निर्माण झाली. एका इसमाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येने लोक एकत्र आले आणि एसआयआर सुनावणीच्या भीतीमुळे त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप केला. यानंतर संतप्त जमावाने एका शाळेत चालू असलेल्या एसआयआर सुनावणी केंद्रावर हल्ला केला.


इटाहारच्या मुराळीपुकुर गावातील चंदू सरकार नामक इसमाचा मृतदेह त्यांच्या घराजवळील आंब्याच्या झाडावर गळफास घेतलेले आढळले. नातेवाईकांच्या मते, त्याची पत्नी जिन्नातून खातून यांच्या नावावर एसआयआर सुनावणीची नोटीस मिळाल्यानंतरच तो तणावाखाली होता. पत्नीला घेऊन सुनावणी शिबिरात जाण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. चंदूच्या मृत्यूची बातमी पसरताच शेकडो लोक काठ्या घेऊन इटाहार हायस्कूलवर पोहोचले, जिथे त्या वेळेस एसआयआर सुनावणी चालू होती. संतप्त जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला केला. यावेळी अधिकारी कसेबसे जीव वाचवून पळाले. त्यानंतर जमावाने परीराजपूर परिसरातील अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. यात अनेक अधिकाऱ्यांना जखमा झाल्या. टेबल, खुर्च्या आणि बेंच तुटवून फेकल्या गेल्या. महत्वाचे दस्तऐवज फाडून पसरवले गेले. घटनेच्या वेळी शाळा सुरू असल्याने हा हिंसक प्रकार पाहून शिक्षक आणि विद्यार्थी घाबरून गेले होते. हल्ल्याची माहिती मिळाल्यावर मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रायगंजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुंतल बंद्योपाध्यायही घटनास्थळी पोहोचले. काही तासांपर्यंत सुनावणी पूर्णपणे थांबवण्यात आली. नंतर कडक सुरक्षा ठेवून सुनावणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. दुसरीकडे, चंदू सरकारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेताना इटाहार चौकावर १२ नंबर राष्ट्रीय महामार्गावर तृणमूल काँग्रेसचे आमदार मुशर्रफ हुसैन आणि त्यांच्या समर्थकांनी विरोध करत रस्त्यावर अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले.

Comments
Add Comment

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद