पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी


दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इटाहारमध्ये सखोल मतदान पुनरावलोकन (एसआयआर / SIR / Special Intensive Revision) संदर्भातील तणाव आणि हिंसात्मक परिस्थिती निर्माण झाली. एका इसमाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येने लोक एकत्र आले आणि एसआयआर सुनावणीच्या भीतीमुळे त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप केला. यानंतर संतप्त जमावाने एका शाळेत चालू असलेल्या एसआयआर सुनावणी केंद्रावर हल्ला केला.


इटाहारच्या मुराळीपुकुर गावातील चंदू सरकार नामक इसमाचा मृतदेह त्यांच्या घराजवळील आंब्याच्या झाडावर गळफास घेतलेले आढळले. नातेवाईकांच्या मते, त्याची पत्नी जिन्नातून खातून यांच्या नावावर एसआयआर सुनावणीची नोटीस मिळाल्यानंतरच तो तणावाखाली होता. पत्नीला घेऊन सुनावणी शिबिरात जाण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. चंदूच्या मृत्यूची बातमी पसरताच शेकडो लोक काठ्या घेऊन इटाहार हायस्कूलवर पोहोचले, जिथे त्या वेळेस एसआयआर सुनावणी चालू होती. संतप्त जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला केला. यावेळी अधिकारी कसेबसे जीव वाचवून पळाले. त्यानंतर जमावाने परीराजपूर परिसरातील अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. यात अनेक अधिकाऱ्यांना जखमा झाल्या. टेबल, खुर्च्या आणि बेंच तुटवून फेकल्या गेल्या. महत्वाचे दस्तऐवज फाडून पसरवले गेले. घटनेच्या वेळी शाळा सुरू असल्याने हा हिंसक प्रकार पाहून शिक्षक आणि विद्यार्थी घाबरून गेले होते. हल्ल्याची माहिती मिळाल्यावर मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रायगंजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुंतल बंद्योपाध्यायही घटनास्थळी पोहोचले. काही तासांपर्यंत सुनावणी पूर्णपणे थांबवण्यात आली. नंतर कडक सुरक्षा ठेवून सुनावणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. दुसरीकडे, चंदू सरकारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेताना इटाहार चौकावर १२ नंबर राष्ट्रीय महामार्गावर तृणमूल काँग्रेसचे आमदार मुशर्रफ हुसैन आणि त्यांच्या समर्थकांनी विरोध करत रस्त्यावर अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले.

Comments
Add Comment

कर्नाटकात बाईक टॅक्सीला उच्च न्यायालयाकडून परवानगी

बंगळूरु : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी बाईक टॅक्सी चालविण्यास परवानगी दिली, तर बाईक टॅक्सी अॅग्रीगेटर्स,

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या