Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड गाठला आहे. रायगड जिल्ह्यातील 'पेण ग्रोथ सेंटर' (Raigad Pen Growth Centre) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एमएमआरडीए (MMRDA) आणि जगातील विविध ११ अग्रगण्य कंपन्यांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या उपस्थितीत हे करार स्वाक्षरित करण्यात आले. 'तिसरी मुंबई' (Third Mumbai) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प तंत्रज्ञान, फिनटेक आणि डेटा सेंटर्सचे पुढील पिढीचे केंद्र ठरणार आहे.





या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे भारताचा पहिला समर्पित 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर' (GCC) जिल्हा उभारला जाणार आहे. यामध्ये दक्षिण कोरियाचा हनव्हा ग्रुप (Hanwha Group), अमेरिकेची फेडएक्स (FedEx), स्वित्झर्लंडची SSB SAUERWEIN आणि सिंगापूरचा मॅपल ट्री (Maple Tree) यांसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे रायगड जिल्हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा नवीन आर्थिक कणा म्हणून उदयास येणार आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक कंपन्यांना रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये गुंतवणूक करण्याचे खुले आवाहन केले. "हा प्रकल्प पुढील पिढीच्या तंत्रज्ञानासाठी सज्ज आहे आणि जागतिक व्यवसायांसाठी हे एक सर्वोत्तम केंद्र ठरेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या करारामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Comments
Add Comment

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी