नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, उपचारांचा खर्च टाळण्यासाठी दोन मित्रांनीच आपल्या मित्राचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.


विनोद कुमार (वय २६), रहिवासी कल्याणपूर, हा नववर्षाच्या दिवशी आपल्या दोन मित्रांसोबत पार्टी करत होता. मद्यपान सुरू असताना नारळ पाणी आणण्याच्या बहाण्याने त्याला झाडावर चढण्यास भाग पाडण्यात आलं. या दरम्यान तोल गेल्याने तो खाली पडला आणि त्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली.


जखम गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर उपचारासाठी मोठा खर्च येईल या भीतीने दोघांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं. विनोदला मदतीसाठी रुग्णालयात नेण्याऐवजी, घरी सोडतो असं सांगून रस्त्यातच तलावाजवळ नेण्यात आलं. तेथे त्याला पाण्यात ढकलून ठार करण्यात आलं.


घटनेनंतर संशय येऊ नये म्हणून आरोपींनी नेहमीप्रमाणे वावर केल्याचं पोलिसांनी सांगितलं. काही वेळानंतर ते पुन्हा घटनास्थळी गेले आणि मृतदेह बाहेर काढून दगड बांधत तो विहिरीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.


विनोद बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांकडे केल्यानंतर तपासाला वेग आला. मोबाईल लोकेशन आणि चौकशीतून आरोपींची भूमिका स्पष्ट झाली. पोलिसांनी सुदीप आणि प्रज्वल या दोघांना अटक केली असून, या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी