टीईटी सक्तीतून जुन्या शिक्षकांना मिळणार मुक्ती?

न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारच्या हालचालींना वेग


पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीमुळे देशभरातील हजारो शिक्षकांच्या मनात चिंता होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षकांना दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले होते. असफल ठरलेल्या शिक्षकांना सेवानिवृत्तीचे आदेश दिले जात होते. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.


केंद्र सरकारकडून टीईटी सक्तीमधून काही शिक्षकांना सूट देण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. या संदर्भात राज्य सरकारकडून शिक्षकांची सविस्तर माहिती मागविण्यात आली असून, ती शिक्षकांसाठी दिलासादायक ठरू शकते. शिक्षण विभागाने १३ जानेवारी २०२६ रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये शिक्षकांच्या नियुक्तीचा कालावधी आणि वयोमानानुसार वर्गीकरण करून माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये २०११ पूर्वी आणि २०११ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांची स्वतंत्र माहिती मागवण्यात आली आहे. राष्ट्रीय बालहक्क शिक्षण कायदा लागू झाल्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. यामुळे २०११ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे. तथापि, २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना या सक्तीपासून सूट मिळण्याची शक्यता आहे. सरकारने या शिक्षकांसाठी वेगळा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. टीईटी परीक्षा सक्तीच्या निर्णयामुळे अनेक अनुभवी शिक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. त्यांना अनेक वर्षांचा अनुभव असूनही, परीक्षा उत्तीर्ण करण्याचे बंधन त्यांच्यासमोर होते; परंतु, केंद्र सरकारच्या नवीन प्रस्तावामुळे या शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ज्या शिक्षकांनी आपल्या जीवनात शिक्षण क्षेत्रात अनमोल योगदान दिले आहे, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची सक्ती न लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपूर हादरलं! १२ वीच्या विद्यार्थ्याचा ११ वीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ काढून धमकी दिली अन् नको नको ते...

नागपूर : शिक्षण आणि परीक्षेचे वय असलेल्या तरुणांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक घटना

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधी वाढवून मिळावा; मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०२५-२६ साठी ९०० कोटी रुपयांची तरतूद होती. सन २०२६ - २७ साठी ही ६९१.९०

Pune: भाजपाने पुण्यात उचललं कठोर पाऊल; ६९ बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबित, 'या' मोठ्या नेत्यांचा समावेश

पुणे : नुकत्याच राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक घडामोडी

Mumbai-Pune ExpressWay : चक्क भाजलेल्या हातांनी रोखला मृत्यू! पेरूच्या खुट्टीनं टळला मोठा अनर्थ; एक छोटी चूक अन् १० किमीचा परिसर झाला असता खाक

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर नुकत्याच झालेल्या महाभीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

Weather Update: महाराष्ट्रातील वातावरणात बदल, कोकण ते विदर्भापर्यंत पुन्हा अलर्ट, ११ फेब्रुवारीला कसं असेल हवामान?

मुंबई: महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानात बदल दिसून येत आहे. हिवाळी थंड आता बऱ्याच प्रमाणात

छत्रपती संभाजीनगरात १२ वीच्या इंग्रजी पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथे इयत्ता १२ वीच्या इंग्रजी