टीईटी सक्तीतून जुन्या शिक्षकांना मिळणार मुक्ती?

न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारच्या हालचालींना वेग


पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीमुळे देशभरातील हजारो शिक्षकांच्या मनात चिंता होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षकांना दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले होते. असफल ठरलेल्या शिक्षकांना सेवानिवृत्तीचे आदेश दिले जात होते. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.


केंद्र सरकारकडून टीईटी सक्तीमधून काही शिक्षकांना सूट देण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. या संदर्भात राज्य सरकारकडून शिक्षकांची सविस्तर माहिती मागविण्यात आली असून, ती शिक्षकांसाठी दिलासादायक ठरू शकते. शिक्षण विभागाने १३ जानेवारी २०२६ रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये शिक्षकांच्या नियुक्तीचा कालावधी आणि वयोमानानुसार वर्गीकरण करून माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये २०११ पूर्वी आणि २०११ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांची स्वतंत्र माहिती मागवण्यात आली आहे. राष्ट्रीय बालहक्क शिक्षण कायदा लागू झाल्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. यामुळे २०११ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे. तथापि, २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना या सक्तीपासून सूट मिळण्याची शक्यता आहे. सरकारने या शिक्षकांसाठी वेगळा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. टीईटी परीक्षा सक्तीच्या निर्णयामुळे अनेक अनुभवी शिक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. त्यांना अनेक वर्षांचा अनुभव असूनही, परीक्षा उत्तीर्ण करण्याचे बंधन त्यांच्यासमोर होते; परंतु, केंद्र सरकारच्या नवीन प्रस्तावामुळे या शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ज्या शिक्षकांनी आपल्या जीवनात शिक्षण क्षेत्रात अनमोल योगदान दिले आहे, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची सक्ती न लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

माथेरानमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूट

कदम दाम्पत्याला दोरीने बांधून चोरटे फरार माथेरान (वार्ताहर): पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये टी स्टॉलवर

Pune School Holiday: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 19 जानेवारीला शाळांना सुट्टी, मुख्य रस्ते बंद,ग्रँड टूरमुळे शहरात...

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना रजा देण्यात

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा