अनेक नगरसेवकांचे पद राहणार की जाणार, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ठरणार; पुढच्या ४८ तासांत निर्णय येण्याची शक्यता

नागपूर : महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबई आणि नागपूरसह एकूण २२ महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अनेक नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून आहे. पुढील ४८ तासांत निर्णय येण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित नगरसेवक चिंतेत आहेत.


महानगरपालिकांच्या ओबीसी आरक्षण प्रकरणी २१ जानेवारी २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निकाल त्याच दिवशी येईल किंवा आणखी काही वेळा सुनावणी झाल्यानंतर येईल. पण हा निकाल विरोधात गेला तर अनेक नगरसेवकांचे पद जाण्याची शक्यता आहे.


नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेत प्रशासनाने जाहीर केलेल्या आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली होती. ही बाब नंतर लक्षात आली. पण सर्वोच्च न्यायालयाने रखडलेल्या निवडणुकांना आणखी विलंब नको म्हणून प्रशासनाने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार निवडणूक घेण्याची परवानगी दिली. निकालानंतर पुढील सुनावणी घेऊ असेही जाहीर केले. आता सर्वोच्च न्यायालयाने वाढीव आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यास नेमक्या कोणकोणत्या नगरसेवकांचे पद जाणार हा प्रश्न निर्माण होईल. आरक्षण देताना चूक झाली म्हणून सगळी आरक्षण प्रक्रियाच नव्याने घेण्यास सांगितले तर मोठा गोंधळ होईल. घेतलेली निवडणूकच अडचणीत सापडेल. यामुळे सर्वोच्च न्यायालय काय म्हणते याकडे अनेकांचे लक्ष आहे.


नागपूर महापालिकेत आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार नागपूरमध्ये एकूण ४० नगरसेवक हे ओबीसींसाठीच्या राखीव जागांवरुन निवडून आले आहेत. यात भाजपचे २८, काँग्रेसचे दहा तर एमआयएम आणि मुस्लीम लीगचे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत. ओबीसींच्या राखीव जागांवरील निवडणूक रद्द झाली तर ४० जागांसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागेल. शिवाय महापौरांची निवड प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर महापालिकेतही सर्वोच्च न्यायालय काय म्हणते याचीच चिंता अनेक नगरसेवकांना सतावत आहे.


सर्वोच्च न्यायालयाने यंदासाठी अपवाद केला आणि पुढील निवडणुकीत खबरदारी घेऊन ५० टक्क्यांच्या आतले आरक्षण देण्याचे निर्देश दिले तर नगरसेवकांवरील अनिश्चिततेचे सावट दूर होईल. पण हे सर्वोच्च न्यायालय काय म्हणते यावरच अवलंबून आहे. यामुळे अनेकांचे लक्ष सर्वोच्च न्यायलाकडे आहे.

Comments
Add Comment

IPL मध्ये चाललंय काय ? दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारे ७५ धावांत ऑलआऊट

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Urea : भारत आणि रशिया संयुक्तपणे वर्षाला २० लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती करणार

नवी दिल्ली : भारत आणि रशिया संयुक्तपणे वर्षाला २० लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती करणार आहेत. यासाठी एक प्रकल्प

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Shivsena Latur : लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा वाढतोय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील