अंबरनाथमधील सत्तासंघर्ष न्यायालयात

नगर परिषद सभा तहकुबीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आजच्या सुनावणीकडे लक्ष


अंबरनाथ : राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले. मात्र या यशाच्या आनंदात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे विरजण पडले आहे. अंबरनाथ नगर नगर परिषदेच्या निवडणुकीत महत्त्वाचा ट्विस्ट समोर आला आहे. नगर नगर परिषदेतील सभापती निवड व सहा विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित केलेली सभा तहकूब करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे अंबरनाथमधील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनण्याची शक्यता आहे.


अंबरनाथ नगर नगर परिषदेत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती करून सत्ता स्थापन केली होती. मात्र विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीचा मुद्दा तापलेला होता. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि अपक्षाने मिळून अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली होती, परंतु नंतर राष्ट्रवादीने शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी केली आणि शिवसेनेची (शिंदे गट) सत्ता स्थापन झाली. यामुळे भाजप सत्तेबाहेर राहावे लागले. न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर उद्या सुनावणी पार पडेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची धाकधूक वाढली आहे.


अंबरनाथ विकास आघाडीने काय मागितले?


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भाजपसोबतची आघाडी तोडण्याबाबत दिलेली प्रतिज्ञापत्रे मागे घेण्याची विनंती ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती मान्य केली. यावर नाराज भाजपच्या नेतृत्वाखालील अंबरनाथ विकास आघाडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.


हायकोर्टाने काय आदेश दिला?


न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान आदेश दिला की, सोमवारी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी बोलावण्यात आलेली सभा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्थगित करावी.


राजकीय अर्थ :


या आदेशामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) राजकीय स्थितीत धाकधूक वाढली आहे. अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन होण्यापासून ते विषय समित्यांच्या निवडीपर्यंतचा प्रवास आता न्यायालयीन प्रक्रियेने प्रभावित झाला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या निर्णयामुळे अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया