पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

शिक्षा पूर्ण होऊनही कैदेत ठेवण्याचा अमानवी प्रकार


पालघर : शिक्षेचा कालावधी संपून तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही मुक्तता न मिळाल्याने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एका भारतीय मच्छीमाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. राष्ट्रीयत्व सिद्ध झाल्यानंतरही त्याला सोडण्यात आले नाही. या घटनेमुळे सीमारेषा चुकून ओलांडलेल्या निष्पाप मच्छीमारांचे प्राण किती काळ असेच जाणार, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. केंद्र सरकार यावर ठोस पावले उचलणार का, असा प्रश्न मच्छीमार कुटुंबांमधून व्यक्त होत आहे.


शुक्रवारी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एका भारतीय मच्छीमाराचा मृत्यू झाला. त्याची शिक्षा जवळपास साडेतीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली होती आणि त्याचे भारतीय नागरिकत्वही सिद्ध झाले होते. अशा परिस्थितीत त्याला केव्हाच मुक्त करणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षा पूर्ण होऊनही त्याला पाकिस्तानने तुरुंगातच ठेवले आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. “पाकिस्तानच्या तुरुंगात काही भारतीय मच्छीमार आजारी असल्याची माहिती मिळत आहे,” असे शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी सांगितले.


गुजरातच्या किनारपट्टीवर मासेमारी करताना अनेकदा बोटी चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत जातात. त्यावेळी पाकिस्तानची मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सी मच्छीमारांना अटक करते आणि त्यांना कराचीतील तुरुंगात पाठवले जाते. सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात महाराष्ट्रातील १९ जणांसह भारतातील एकूण १९९ मच्छीमार कैदेत आहेत. त्यापैकी अनेकांची शिक्षा तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहे. तरीही त्यांची मुक्तता झालेली नाही. त्यामुळे या मच्छीमारांना मानसिक छळ सहन करावा लागत आहे.


घरातील कमावता सदस्य कैदेत असल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह ठप्प झाला आहे. कर्ता पुरुष नसल्याने अनेक कुटुंबे नैराश्यात जगत आहेत. शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही कैदेत असलेल्या मच्छीमारांच्या सुटकेसाठी महिनाभरापूर्वी काही कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली होती आणि आपल्या आप्तांना मायदेशी परत आणण्याची विनंती केली होती. मात्र अद्याप परराष्ट्र विभागाकडून ठोस हालचाल दिसून आलेली नाही. भारत सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या भारतीय मच्छीमारांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जतीन देसाई यांनी केली आहे.

Comments
Add Comment

CJP : सीजेपी आंदोलनकाळात महाराष्ट्रात दाखल गुन्हे रद्द होणार

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मधील अनियमिततेविरोधात आणि कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ

  Quick Breakfast Recipes : फक्त १५ मिनिटांत तयार होणारे ८ झटपट नाश्त्याचे पदार्थ

सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप भूक लागलेली असते. (Easy & Quick Snack Recipes For Breakfast). यातच सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याची घाईगडबड तसेच

AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे

अल्लू अर्जुन आज देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पुष्पा फ्रँचायझीच्या अभूतपूर्व

High Protein Fruits : कोणत्या फळात किती प्रोटीन? रोजच्या आहारात फळांचा समावेश कसा करावा?

रोजच्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेक जण "हाय-प्रोटीन फळे" शोधण्याचा प्रयत्न करतात. फळे ही

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त

Solo Trip : सोलो ट्रीपला जाण्याचा प्लॅन करताय ? मग या ठिकाणांचा नक्की विचार करा

मुंबई : एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. सोलो ट्रिपमुळे (Solo Trip) नवीन ठिकाणं अनुभवता येतात,