भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सज्ज झाला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नुकतेच भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठी अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) brics2026.gov.in आणि लोगोचे उद्घाटन केले. जयशंकर यांनी भारताच्या दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य ‘मानवता प्रथम’ आणि ‘लोककेंद्रित’ असल्याचे सांगितले. ब्रिक्स २०२६ चा लोगो केवळ चिन्ह नसून भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि जागतिक ऐक्याचा संदेश आहे.


लोगोची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळावर आधारित असून, मध्यभागी ‘नमस्ते’ मुद्रा स्वागत व आदराचे प्रतीक आहे. लोगोच्या पाकळ्यांमध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या ध्वजांचे रंग समाविष्ट आहेत, जे विविधतेत एकता दर्शवतात.


२०२६ मध्ये ब्रिक्स समूहाची स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. जयशंकर यांनी सांगितले की भारत उत्तरेकडील देशांच्या (ग्लोबल साउथ) समस्या जागतिक स्तरावर मांडण्यासाठी संधीचा उपयोग करेल आणि संयुक्त राष्ट्रे, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) सारख्या संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. वेबसाइट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म नव्याने लाँच करण्यात आलेली वेबसाइट brics2026.gov.in हे बैठका, उपक्रम आणि करारांची माहिती देणारे मुख्य माध्यम असणार आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि जगाला भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात होणाऱ्या हालचालींची वेळेवर माहिती मिळेल.

Comments
Add Comment

नणंद भावजयीचा वाद ; मालमत्ता वादात प्रिया कपूरचा मोठा निर्णय

Sunjay Kapur Property Case: कपूर कुटुंबियातील मालमत्ता आणि वारसाहक्काचा वाद गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत राहिला

निर्यातक्षम राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर

नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांकात तामिळनाडू मागे नवी दिल्ली : नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक -

गिफ्ट सिटीमध्ये १५ देशांच्या परकीय चलनांमध्ये करता येतात व्यवहार

भारतातील एक शहर जिथे रुपयांऐवजी वापरले जाते परकीय चलन नवी दिल्ली : आपल्याला भारतात कोठेही उद्योग करायचा असेल तर

मणिकर्णिका घाटावर बुलडोजर

दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा वाराणसी : वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

बदरी-केदारसह चारधाममध्ये मोबाईल बंदी ,प्रशासनाची रील आणि फोटोवर कडक नजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली