पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या. सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिवसेनेने भाजपबरोबरची युती शहरात तोडली. त्यानंतर शिवसेनेने स्वबळावर ११९ जागा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेचा हा स्वबळाचा निर्णय तारणार का असा सवाल उपस्थित केला जात होता. शुक्रवारी महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर स्वबळाचा नारा शिवसेनेला जड गेल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. पुण्यात शिवसेनेने खातेही उघडता न आल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांना आत्मपरीक्षणाची वेळ आल्याचे बोलले जात आहे.


राज्यात भाजप, शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) असे महायुतीचे सरकार आहे. पुण्यातदेखील भाजप आणि शिवसेनेची युती होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेनेने भाजपकडे ३५ जागांची मागणी केली होती. पण, भाजपने प्रत्यक्षात १५ जागा देण्याची तयारी दर्शवली. सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ११९ जागांवर शिवसेनेने शहरात उमेदवार दिले.


जास्तीत जास्त उमेदवार शिवसेनेचे निवडून यावेत यासाठी शिवसेनेचा सोशल मीडिया सेल, शहरातील नेते जोरात कामालादेखील लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांचे देखील शहरात आयोजन करण्यात आले होते. असे असताना देखील शिवसेनेने भोपळाही फोडता न आल्याने मतदारांनी शिंदेसेनेच्या एकला चलो रे च्या भूमिकेला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. युतीमध्ये लढले असते तर किमान शिवसेनेच्या काही जागा निवडून आल्या असता असे चित्र शुक्रवारी दिसून आले.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर