Nitesh Rane : हाहाहा, हीहीही..."उद्धवजी आणि पेग्विनला"; जय श्रीराम!"... नितेश राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

मुंबईत महायुतीची मुसंडी पाहताच भाजपचा प्रहार


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत महायुतीने (भाजप-शिंदे गट) निर्णायक आघाडी घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या विजयाचा आनंद साजरा करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची थेट खिल्ली उडवली आहे. नितेश राणे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात ते ठाकरे गटाच्या पराभवावर हसताना दिसत आहेत.



काय आहे 'त्या' व्हिडीओमध्ये?




नितेश राणे यांनी शेअर केलेल्या २२ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये ते अत्यंत आनंदात दिसत असून ठाकरे गटाच्या स्थितीवर हसत आहेत. "उद्धवजी आणि पेग्विनला जय श्रीराम" असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईत गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या ठाकरेंच्या सत्तेला यंदा सुरुंग लागल्याचे पाहून राणे यांनी हा 'विक्टरी' मोडमधील व्हिडीओ शेअर केला आहे.



"रडणाऱ्यांना मुंबईकरांनी नाकारलं"...


निकालांवर भाष्य करताना नितेश राणे यांनी मंत्र्यांच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. "उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या दिवशी शाई पुसल्याचे जे रडगाणे गायले होते, त्याला मुंबईकरांनी चोख उत्तर दिले आहे. मुंबईकरांनी काम करणाऱ्या 'महायुती'ला पसंती दिली असून, घरात बसून राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे," असे राणे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र येऊनही महायुतीला रोखू शकले नाहीत, याकडे नितेश राणे यांनी लक्ष वेधले. "२० वर्षांनंतर दोन भाऊ एकत्र आले तरीही त्यांना १०० चा आकडाही गाठता आला नाही. हेच महायुतीचे यश आणि त्यांच्या नेतृत्वाचे अपयश आहे," अशी बोचरी टीका त्यांनी केली. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून नितेश राणे यांच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

Prashant Kishor : जनतेने बिहारसाठी 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिला, विजयानंतरची प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

पाटणा : बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे