जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात १० ते १५ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.


या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, आज १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील सरस्वती भुवन व शनी मंदिर परिसरात तसेच काली मशीद परिसरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या काही मतदारांवर व नागरिकांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. एकामागून एक नागरिकांवर हल्ला करत या कुत्र्याने अनेकांना चावा घेतला. काही जणांच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून एका व्यक्तीच्या हाताची करंगळी तुटल्याची माहिती आहे.


या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये शिवराज गणेश वेव्हारे, शेख मोबीन, तारेख सुबानी, कृष्णा सुपारकर, नासेर चाऊस, राजश्री कसबे, शेख रीहान, सैय्यद सलादीन, अमिनोदिन शेख, मोहसिन कुरेशी, आसिफ कुरेशी, संगीता अशोक साळवे, स्नेहा श्रीनिवास येमुल, शेख अतिक आदी नागरिकांचा समावेश आहे.


या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, एकूण १५ जणांना कुत्र्याने चावा घेतला असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची अधिकृत माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आशिष देवडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक