भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या अहवालानुसार भारतीय पासपोर्टच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून भारत आता ८० व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पायऱ्यांची मोठी झेप घेतली असून आता भारतीय नागरिकांना जगातील ५५ देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधेद्वारे प्रवास करता येणार आहे. भारताची ही प्रगती देशाच्या मजबूत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रतीक मानली जात आहे.


या जागतिक क्रमवारीत सिंगापूर १९२ देशांच्या सुविधेसह पहिल्या स्थानावर आहे, तर जपान आणि दक्षिण कोरिया दुसऱ्या स्थानी आहेत. भारताने आपल्या शेजारील देशांच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली असून पाकिस्तान ९८ व्या तर बांगलादेश ९५ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भारतीय पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले थायलंड, मलेशिया आणि मॉरिशस यांसारख्या देशांनी भारतीय पर्यटकांना व्हिसाच्या कटकटीतून मुक्त केले आहे. यामुळे आता कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय केवळ पासपोर्ट घेऊन या देशांची सफर करणे शक्य होणार आहे.


या वाढीव सुविधेचा फायदा आशिया, आफ्रिका, ओशनिया, कॅरिबियन आणि मध्य पूर्वेतील अनेक भागांमधील भारतीय प्रवाशांना होईल. लोकप्रिय व्हिसा-मुक्त देशांमध्ये थायलंड, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ, बार्बाडोस, फिजी, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि इतर समावेश आहे. व्हिसा-ऑन-अरायव्हल देशांमध्ये इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका, केनिया, जॉर्डन आणि फिलीपिन्स यांचा समावेश आहे. या सुविधेमुळे आता फॅमिली ट्रिप, हनिमून किंवा सुट्ट्यांच्या सहलींचे नियोजन करणे भारतीयांसाठी अधिक सुलभ होईल. प्रत्येक देशामध्ये राहण्याचा कालावधी हा १५ दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत वेगवेगळा असू शकतो. ही आनंदाची बातमी असली तरी पर्यटकांनी एका गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे की हे नियम आंतरराष्ट्रीय धोरणांनुसार बदलू शकतात, त्यामुळे प्रवासापूर्वी संबंधित देशाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासून घेणे सोयीचे ठरेल. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांसाठी अद्याप व्हिसाची गरज असली तरी ५५ देशांनी दिलेली ही सूट भारतीय पर्यटकांच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा पुरावा आहे.


जेव्हा आपण परदेश प्रवासाचा विचार करतो, तेव्हा व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया सर्वात कठीण असते. मात्र आता अंगोला, बार्बाडोस, भूतान, फिजी, जमैका, कझाकिस्तान, नेपाळ आणि सेनेगल यांसारख्या देशांमध्ये भारतीय पर्यटकांना थेट प्रवेश मिळणार आहे. याशिवाय इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका, कंबोडिया, कतार आणि सेशेल्स यांसारख्या देशांमध्ये पोहोचल्यानंतर विमानतळावरच व्हिसा मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. केनिया आणि म्यानमार सारख्या देशांनी इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन म्हणजेच ई-व्हिसाची सुविधा दिली आहे, ज्यामुळे घरबसल्या ऑनलाइन परवानगी मिळवणे सोपे झाले आहे.


Comments
Add Comment

PM Narendra Modi : शरद पवार-मोदी भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी

Sharad Pawar : विरोधकांच्या रणनीतीदरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र

Sikkim Landslide : सिक्कीमच्या जलविद्युत प्रकल्पात भीषण दुर्घटना; बोगदा कोसळून २० जणांचा मृत्यू, ५ जण बेपत्ता

सिक्कीम : सिक्कीम (Sikkim) मधील नामची (Namchi) जिल्ह्यात एनएचपीसी (NHPC) च्या तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पातील (Hydroelectric Project)

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.