Devendra Fadanvis : हवं तर ऑईल पेंट वापरा, पण विनाकारण...; शाईच्या वादावर फडणवीसांचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू आहे. मुंबईत सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान झाले आहे. दाट लोकवस्तीच्या भागात मतदारांचा उत्साह दिसून येत असतानाच, दक्षिण मुंबई आणि उपनगरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी नोंदवली गेली आहे.


मतदानादरम्यान काही राजकीय नेत्यांनी आणि विरोधकांनी 'मतदानाची शाई पुसली जात आहे' असा गंभीर आरोप केला होता. मात्र, निवडणूक प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बीएमसी प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. माध्यमांमध्ये प्रसारित होणारे वृत्त हे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही." प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा



त्यांना वाटल्यास त्यांनी ऑईल पेंटचा वापर करावा....




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये मतदान केले. मतदानानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी काही पत्रकारांनी विरोधकांच्या शाई पुसली जात असल्याच्या आरोपाचा उल्लेख केला. यावर बोलताना मुख्यमंत्र्‍यांनी कडक शब्दांत भाष्य केले. "निवडणूक निःपक्षपाती व्हायला हवी, पण प्रत्येक गोष्टीवर आरडाओरडा करून संशय निर्माण करणे चुकीचे आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. स्वतःच्या बोटावरील शाई दाखवत मुख्यमंत्री म्हणाले की, "बघा, माझ्याही बोटाला शाई लावली आहे, ती पुसली जातेय का? विनाकारण प्रत्येक गोष्टीचा बाऊ करणे योग्य नाही. जर कोणाला शाईबद्दल शंका असेल, तर निवडणूक आयोगाने त्याकडे लक्ष द्यावे. त्यांना वाटल्यास त्यांनी ऑईल पेंटचा वापर करावा, पण निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यात दुमत नाही." विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांवर निशाणा साधताना फडणवीस पुढे म्हणाले की, "निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता हवीच, परंतु केवळ गोंधळ घालण्यासाठी आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रश्न उपस्थित करणे अत्यंत चुकीचे आहे." निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती पडताळणी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


मलबार हिल, वांद्रे (पश्चिम), जुहू आणि कुलाबा यांसारख्या उच्चभ्रू भागांत मतदानाची गती अतिशय संथ आहे. सुट्टीचा आनंद घेण्याकडे या भागातील नागरिकांचा कल असल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसून येत आहे. यावर प्रशासनाने चिंता व्यक्त केली असून, सोसायट्यांमधील मतदारांना बाहेर पडण्यासाठी विविध माध्यमांतून आवाहन केले जात आहे.


नेत्यांनी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन केले आहे. "ही निव्वळ सुट्टी नाही, तर शहराच्या विकासात सहभागी होण्याची संधी आहे. तक्रार करण्यापेक्षा आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी घराबाहेर पडा," असे आवाहन अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मतदानानंतर केले.

Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे