Devendra Fadanvis : हवं तर ऑईल पेंट वापरा, पण विनाकारण...; शाईच्या वादावर फडणवीसांचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू आहे. मुंबईत सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान झाले आहे. दाट लोकवस्तीच्या भागात मतदारांचा उत्साह दिसून येत असतानाच, दक्षिण मुंबई आणि उपनगरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी नोंदवली गेली आहे.


मतदानादरम्यान काही राजकीय नेत्यांनी आणि विरोधकांनी 'मतदानाची शाई पुसली जात आहे' असा गंभीर आरोप केला होता. मात्र, निवडणूक प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बीएमसी प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. माध्यमांमध्ये प्रसारित होणारे वृत्त हे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही." प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा



त्यांना वाटल्यास त्यांनी ऑईल पेंटचा वापर करावा....




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये मतदान केले. मतदानानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी काही पत्रकारांनी विरोधकांच्या शाई पुसली जात असल्याच्या आरोपाचा उल्लेख केला. यावर बोलताना मुख्यमंत्र्‍यांनी कडक शब्दांत भाष्य केले. "निवडणूक निःपक्षपाती व्हायला हवी, पण प्रत्येक गोष्टीवर आरडाओरडा करून संशय निर्माण करणे चुकीचे आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. स्वतःच्या बोटावरील शाई दाखवत मुख्यमंत्री म्हणाले की, "बघा, माझ्याही बोटाला शाई लावली आहे, ती पुसली जातेय का? विनाकारण प्रत्येक गोष्टीचा बाऊ करणे योग्य नाही. जर कोणाला शाईबद्दल शंका असेल, तर निवडणूक आयोगाने त्याकडे लक्ष द्यावे. त्यांना वाटल्यास त्यांनी ऑईल पेंटचा वापर करावा, पण निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यात दुमत नाही." विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांवर निशाणा साधताना फडणवीस पुढे म्हणाले की, "निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता हवीच, परंतु केवळ गोंधळ घालण्यासाठी आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रश्न उपस्थित करणे अत्यंत चुकीचे आहे." निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती पडताळणी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


मलबार हिल, वांद्रे (पश्चिम), जुहू आणि कुलाबा यांसारख्या उच्चभ्रू भागांत मतदानाची गती अतिशय संथ आहे. सुट्टीचा आनंद घेण्याकडे या भागातील नागरिकांचा कल असल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसून येत आहे. यावर प्रशासनाने चिंता व्यक्त केली असून, सोसायट्यांमधील मतदारांना बाहेर पडण्यासाठी विविध माध्यमांतून आवाहन केले जात आहे.


नेत्यांनी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन केले आहे. "ही निव्वळ सुट्टी नाही, तर शहराच्या विकासात सहभागी होण्याची संधी आहे. तक्रार करण्यापेक्षा आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी घराबाहेर पडा," असे आवाहन अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मतदानानंतर केले.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या