मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे यांनी मतदानानंतर केलेल्या एका वक्तव्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी पुण्याच्या सध्याच्या विकास प्रक्रियेबाबत आपली भूमिका मांडली.


पुण्याचा विस्तार वेगाने होत असला, तरी हा बदल नागरिकांसाठी अत्यंत गरजेचा आहे का?, असा प्रश्न भावे यांनी उपस्थित केला. विकास म्हणजे केवळ उंच इमारती उभ्या राहणे नव्हे, तर त्यासोबत मोकळ्या जागा, मैदाने आणि सार्वजनिक सुविधा असणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. काही भागांमध्ये कमी उंचीच्या इमारतींच्या जागी मोठमोठ्या संकुलांचे बांधकाम होत असल्याने शहरावर ताण वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांच्या भूमिकेवरही भर दिला. केवळ मतदान करून थांबणे पुरेसे नसून, निवडून आलेल्या प्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्ष ठेवणे ही नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. नागरिक एकत्र येऊन आपली मतं ठामपणे मांडतील, तरच विकासाची दिशा बदलू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


शहर नियोजनाबाबत बोलताना भावे यांनी मोकळ्या जागांचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांसाठी खेळाची ठिकाणे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याच्या जागा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे सांगत, विकासाचे निकष पुन्हा एकदा तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, त्यांच्या या मतप्रदर्शनामुळे पुणेकरांमध्ये चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर समोर अलेलले हे वक्तव्य पुणेकरांना
भविष्यासंदर्भात विचार करायला लावणारे आहे.

Comments
Add Comment

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस