'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा


नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या कोणत्याही साहसाला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सुरू केलेले 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच आहे," अशा कडक शब्दांत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.


लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरवेळी जम्मू -काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराने जवळपास १०० पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. १० मे रोजी शस्त्रसंधी झाल्यानंतर जम्मू -काश्मीर मधील परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतीय लष्कर सीमेवर अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचा पुनरूच्चार यावेळी द्विवेदी यांनी केला. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले, जम्मू-काश्मीर मधील दहशतवाद्यांचा आकडा आता एकअंकी आहे.” दहशतवादी संघटनांना जाऊन मिळणाऱ्या तरूणांची संख्या शून्य असल्याचे द्विवेदी म्हणाले. लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले की, गरज पडल्यास भारतीय लष्कर पुन्हा एकदा 'ग्राउंड ऑफेंसिव्ह' करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. पाकिस्तानकडून होणाऱ्या कृत्याला भारतीय लष्कर अत्यंत प्रभावीपणे आणि ताकदीने उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


चीन सीमेबाबतही स्पष्ट भूमिका :


एलएसीवरील परिस्थितीबाबत बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, "चीनसोबत राजनैतिक चर्चा सुरू असली, तरी लष्करी सज्जतेत कोणतीही कपात केलेली नाही. पायाभूत सुविधांच्या विकासावर आमचा भर असून आमचे जवान कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहेत."

Comments
Add Comment

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि