'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा


नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या कोणत्याही साहसाला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सुरू केलेले 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच आहे," अशा कडक शब्दांत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.


लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरवेळी जम्मू -काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराने जवळपास १०० पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. १० मे रोजी शस्त्रसंधी झाल्यानंतर जम्मू -काश्मीर मधील परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतीय लष्कर सीमेवर अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचा पुनरूच्चार यावेळी द्विवेदी यांनी केला. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले, जम्मू-काश्मीर मधील दहशतवाद्यांचा आकडा आता एकअंकी आहे.” दहशतवादी संघटनांना जाऊन मिळणाऱ्या तरूणांची संख्या शून्य असल्याचे द्विवेदी म्हणाले. लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले की, गरज पडल्यास भारतीय लष्कर पुन्हा एकदा 'ग्राउंड ऑफेंसिव्ह' करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. पाकिस्तानकडून होणाऱ्या कृत्याला भारतीय लष्कर अत्यंत प्रभावीपणे आणि ताकदीने उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


चीन सीमेबाबतही स्पष्ट भूमिका :


एलएसीवरील परिस्थितीबाबत बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, "चीनसोबत राजनैतिक चर्चा सुरू असली, तरी लष्करी सज्जतेत कोणतीही कपात केलेली नाही. पायाभूत सुविधांच्या विकासावर आमचा भर असून आमचे जवान कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहेत."

Comments
Add Comment

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कोलकाता : पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार १५ मार्च रोजी निवडणूक

राज्यसभेसाठी उमेदवार कसे निवडले जातात? एका जागेसाठी किती मते आवश्यक आहेत?, समजून घ्या.

नवी दिल्ली: संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या ३७ जागा रिक्त आहेत. या ३७ जागांसाठी मतदान होणार होते.

ऑस्करच्या रेड कार्पेटवर ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकने हॉलिवूड स्टार्स पडल्या फिक्या

मुंबई: ९८ व्या ॲकॅडमी पुरस्कार सोहळा (Oscars 2026) लॉस एंजेलिस इथल्या 'डॉल्बी थिएटर'मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.

ओडिशात रुग्णालयाच्या ICU ला आग, एवढ्या रुग्णांचा मृत्यू

कटक : ओडिशातील कटकच्या सरकारी एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी पहाटे आग लागली. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागली.