प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार


विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी प्रचाराची मुदत संपली असून, उमेदवारांनी आता खाजगी रीत्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज झाली आहे. मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र, स्ट्रॉंग रूम, कर्मचारी प्रशिक्षण, अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.


वसई विरार महानगरपालिका हद्दीत ११५ जागांसाठी उद्या ( गुरुवारी ) मतदान होणार आहे. यासाठी एकूण ५४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ११ लाख २६ हजार ४०० मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. निवडणुकीसाठी एकूण १ हजार ३३५ मतदार केंद्र तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी एकूण ८ हजार १० कर्मचारी तैनात करण्यात आले असून या सर्वांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. तसेच ३१७ ठिकाणी दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त निवडणुकीकरिता ९ निवडणूक निर्णय अधिकारी आणि ९० केंद्र निहाय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. तसेच प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली असून वसई विरार मधील मतदारांनी मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.


७० टक्के मतदारांना स्लिप पोहचल्या :


वसई - विरार महानगरपालिका हद्दीतील उमेद्वारांसाठी शहराबाहेर राहणाऱ्या मतदारांकडून टपाली मतदान करण्यात आले आहे. एकूण ९३२ मतदारांनी टपाली मतदान केले आहे. तसेच यासह उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदारांपर्यंत मतदान स्लिप पोचविण्याचे काम देखील सुरु असून ते ७० टक्के पूर्ण झाल्याची माहिती पालिकेने दिली. तसेच मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती हवी असल्यास पालिकेच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती उपलब्ध असल्याची माहिती पालिकेने दिली. यासह मतदान करताना मतदारांनी ४ मत एका वेळी देणे गरजेचे आहे. मात्र एखाद्या मतदाराने केवळ एकाच उमेदवाराला मत दिल्यानंतर इतर तिघांना मत देण्यास नकार दिल्यास उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मदतीने नोटावर मत देण्यात येणार असल्याचिं माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

Comments
Add Comment

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही