उबाठाने मिनी कोकण भांडुपला बकाल केले!

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; १६ तारखेनंतर भांडुपमध्ये विकासाची गंगा आणू


मुंबई : कोकण नगर, भांडुप येथे झालेल्या सभेत मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी उबाठा आणि ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “उबाठाने ‘मिनी कोकण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भांडुपला बकाल अवस्थेत नेले असून, १६ तारखेनंतर येथे विकासाची गंगा आणू,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


राणे म्हणाले की, “पूर्ण राज्यभर प्रचार करत करत मी आता मिनी कोकणात, म्हणजेच भांडुपमध्ये येऊन थांबलो. कोकण आणि भांडुपमधील परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक आहे. कोकणातील घरे, रस्ते आणि निसर्ग सौंदर्य पाहा, आणि इथली परिस्थिती पाहा. येथील कोकणी माणसांची अवस्था बदलण्याची गरज आहे.”
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली; मात्र त्यांच्या पुढील पिढीने त्या विचारांशी प्रतारणा केली. त्यामुळे मराठी माणूस मुंबईत का कमी झाला, याचे उत्तर उबाठावाल्यांनी द्यायला हवे. त्यांच्या सोबत फरफटत गेलेल्यांनीही (मनसे) त्यांना जबाबदार धरले पाहिजे. ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनाही पटले आहे. त्यामुळे आता कोकणी माणसाने त्यांचा नाही, तर स्वतःचा विचार केला पाहिजे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.


कोकणातील लोकसभा आणि विधानसभा निकालांचा उल्लेख करत राणे म्हणाले, “कोकणातील जनतेने निर्धार केला आणि सर्व खासदार महायुतीचे निवडून आले. विधानसभेत फक्त भास्कर जाधव थोडक्या मतांनी निवडून आले. कोकणातील विकास भांडुपमध्ये पाहायचा असेल तर १५ तारखेला महायुतीशिवाय दुसरा विचार करू नका. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की कोकण हा शिवसेनेचा कणा आहे. तोच कणा मोडण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. येत्या १६ तारखेला महायुतीचा महापौर बसल्यावर उद्धव ठाकरे बॅग पॅक करून लंडनला जातील”, असा दावाही त्यांनी केला.


शेवटी कोकणवासीयांना उद्देशून ते म्हणाले, “सरकारमध्ये तुमच्या या भावाचे वजन आहे. देवा भाऊंच्या आवडत्यांपैकी मी एक आहे. काळजी करू नका. १५ तारखेला फक्त ‘जय कोकण’ म्हणा आणि कमळ चिन्ह दाबा”, असे आवाहन देखील त्यांनी केले.

Comments
Add Comment

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी, महिला आणि युवकांचा बार्शी येथील सभेत आमदार दिलीप सोपल यांच्यावर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

Shocking CCTV: मॉडेलच्या मैत्रिणीला ॲसिड अटॅकची धमकी; जाब विचारायला गेल्यामुळे मॉडेलवर जीवघेणा हल्ला

मुंबई : मुंबईचे उपनगर असलेल्या अंधेरी पश्चिम भागातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरीमधील नावाजलेला परिसर

सरकारी सुट्टी पण बँकिंग सेवा सुरू राहणार, सरकारी व्यवहारांसाठी RBIचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ चा शेवटचा दिवस असलेल्या ३१ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी सरकारी