पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

पुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी’ (पुणे ट्रॅफिक पोलिस) अॅपच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई केली जात आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख नागरिकांनी ॲपद्वारे तक्रारी केल्या असून, सुमारे नऊ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शहर वाहतूक शाखेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात ‘पीटीपी’ अॅपद्वारे सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या व्यक्तींचा गौरव २३ मार्च रोजी पोलिस आयुक्तालयात करण्यात आला. या वेळी विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. या योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाला ५० हजार, द्वितीय २५ हजार, तृतीय १५ हजार, चतुर्थ १० हजार आणि पाचव्या क्रमांकाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच, अॅपवर प्राप्त तक्रारींवर प्रभावी कारवाई करणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव उपस्थित होते.


वाहतूक शाखेच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे एक लाख ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी ‘पीटीपी’ अॅपचा वापर केला आहे. या ॲपद्वारे दोन लाख ४९ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची पडताळणी करून एक लाख ७६ हजारांपेक्षा अधिक प्रकरणांमध्ये सुमारे नउ कोटी ३२ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.पुणे महापालिका आणि शहर पोलिस यांच्या वतीने ‘होर्डिंगमुक्त पुणे’ अभियान हाती घेण्यात आले आहे. विशेष मोहीम राबवून अनधिकृत होर्डिंग, रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी ‘पीटीपी’ अॅपचा वापर करून वाहतूक नियमभंग, बेकायदेशीर होर्डिंग, पार्किंग आणि अडथळे निर्माण करणाऱ्या बाबींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

Comments
Add Comment

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)