आयोगाच्या नियमामुळे गोंधळात गोंधळ,

प्रचार बंदी नंतरही उमेदवाराला गाजावाजा न करता प्रचार करता येणार?


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात आल्यानंतर उमेदवाराला पुढील प्रचाराला पूर्णपणे बंदी राहणार आहे. परंतु प्रचार बंद झाल्यानंतर उमेदवाराला पुढील प्रचाराबाबत आयोेगाने जारी केलेल्या नियमांमुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये गोंधळात गोंधळ निर्माण झाला आहे. आयोगाने निवडणूक आचारसंहितेबाबत जारी केलेल्या नियमांमध्ये मंगळवारी सायंकाळी प्रचार थांबल्यानंतर माईकचा वापर न करता प्रचार करता येईल असे म्हटले आहे. आयोगाच्या या नियमांमुळे प्रचार थांबल्यानंतर प्रचार करण्यास परवानगी आहे की छुप्या प्रचाराला उघडपणे परवानगी दिली अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहितेच्याबाबत सर्वसाधारण सूचना करताना जाहीर प्रचाराच्या कालवधीबाबतही सूचना केल्या आहेत. यामध्ये अधिनियमातील तरतुदी व त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे आदेश यानुसार जाहीर प्रचाराचा कालावधी मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर म्हणजे १० तारखेला मतदान असल्यास ८ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार बंद होईल. म्हणजेच या कालावधीमध्ये कोणतीही प्रचार सभा घेता येणार नाही. तसेच कोणत्याही दिवशी रात्री दहा नंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच मोर्चे, सभा इत्यादी घेता येणार नाही.

जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर उमेदवार मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जावून प्रचार करू शकतील, मात्र, माईकचा वापर करता येणार नाही आणि समुहाने फिरता येणार नाही असे यामध्ये म्हटले आहे.

आयोगाच्या निर्देशानुसार, उमेदवाराला प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर घरोघरी जावून लोकांच्या गाठीभेटी घेता येतील अशाप्रकारच्या स्पष्ट सूचना असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळात गोंधळ निर्माण झाला आहे. एरव्ही निवडणूक प्रचार संपुष्टात आल्यानंतर विविध सोसायटी, वस्त्या आणि मंडळांमध्ये छुप्या बैठका घेतल्या जातात आणि उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी मतदान करण्याचे आवाहन करतात. या भेटीगाठीमध्ये कोणत्याही प्रकारे चिन्ह किंवा उमेदवार जाहिरपणे प्रचार न करता छुप्या पध्दतीने बैठका घेवून प्रचार करत असतात. त्यामुळे प्रचारानंतर केल्या जाणाऱ्या या छुप्या प्रचाराला अधिकृत मान्यताच देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या