प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी केली जात आहे. मुंबईतील भविष्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही मागणी आता जोर धरु लागली आहे. उद्यानांच्या दैनंदिन देखभालीसाठी पुरेशा पाणी पुरवठयाची कायमस्वरुपी स्त्रोत म्हणून या विहिरींचे बांधकाम केले जावे अशी मागणी होत आहे.


मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केलीआहे. आपल्या ठरावाच्या सूचनेमध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेची जी जी उद्याने आहेत, हया उद्यानात सकाळ-संध्याकाळ नागरिक चालण्यासाठी येतात, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्यावर बसण्यासाठी येतात व लहान मुलेही खेळण्यासाठी येतात. शाळांना सुट्टया पडल्या की सदर उद्यानांमध्ये जास्त गर्दी पहावयास मिळते,असे नमुद केले.


उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय तसेच उद्यानांमधील हिरवळ (गवत) व शोभेची झाडे, वेली वर्षभर विशेषतः उन्हाळयात टवटवीत ठेवण्यासाठी नियमित आणि पुरेशा दररोज हजारो लिटर पाणीपुरवठयाची गरज असते. परंतु शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मूळातच मर्यादित असतो किंवा अनेकदा पाणीपुरवठयात कपातही केली जाते. तसेच, टँकरद्वारे पाणी मागवणे महापालिकेसाठी खर्चिक बाब आहे. त्यामुळे उद्यानाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी व वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी कूपनलिका (बोअरवेल) ही आजच्या काळातील एक अनिवार्य गरज बनली आहे. त्यामुळे हिरवळीच्या शाश्वत संगोपनाचा एक महत्वाचा भाग म्हणून मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी डॉ सईदा खान यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना