प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी केली जात आहे. मुंबईतील भविष्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही मागणी आता जोर धरु लागली आहे. उद्यानांच्या दैनंदिन देखभालीसाठी पुरेशा पाणी पुरवठयाची कायमस्वरुपी स्त्रोत म्हणून या विहिरींचे बांधकाम केले जावे अशी मागणी होत आहे.


मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केलीआहे. आपल्या ठरावाच्या सूचनेमध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेची जी जी उद्याने आहेत, हया उद्यानात सकाळ-संध्याकाळ नागरिक चालण्यासाठी येतात, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्यावर बसण्यासाठी येतात व लहान मुलेही खेळण्यासाठी येतात. शाळांना सुट्टया पडल्या की सदर उद्यानांमध्ये जास्त गर्दी पहावयास मिळते,असे नमुद केले.


उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय तसेच उद्यानांमधील हिरवळ (गवत) व शोभेची झाडे, वेली वर्षभर विशेषतः उन्हाळयात टवटवीत ठेवण्यासाठी नियमित आणि पुरेशा दररोज हजारो लिटर पाणीपुरवठयाची गरज असते. परंतु शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मूळातच मर्यादित असतो किंवा अनेकदा पाणीपुरवठयात कपातही केली जाते. तसेच, टँकरद्वारे पाणी मागवणे महापालिकेसाठी खर्चिक बाब आहे. त्यामुळे उद्यानाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी व वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी कूपनलिका (बोअरवेल) ही आजच्या काळातील एक अनिवार्य गरज बनली आहे. त्यामुळे हिरवळीच्या शाश्वत संगोपनाचा एक महत्वाचा भाग म्हणून मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी डॉ सईदा खान यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Sejal Pawar : एमबीबीएस विद्यार्थिनीकडून रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीपत्र सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयातील एमबीबीएस

Sejal Pawar Controversy : मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही, कारवाई होणारच

वैद्यकीय विद्यार्थिनी सेजल पवार प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया मुंबई (विशेष

Devendra Fadnavis : अल निनोचा मोठा परिणाम राज्यावर होईल, टास्क फोर्स तयार

मुंबई : अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. या संदर्भात आपण तयारी करत आहोत. आपण त्याचा टास्क फोर्स तयार

Devendra Fadnavis : गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात दिले होते स्पष्ट संकेत अन्न व औषध प्रशासन मार्फत अत्यंत

Dahanu Love Jihad : डहाणू लव्ह जिहाद प्रकरणी डीसीपी मीना मकवानांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना

एसआयटी स्थापनेसाठी आमदार चित्रा वाघ यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे

Devendra Fadnavis : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा १०० टक्के सौर ऊर्जेवर आणणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई :