प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी केली जात आहे. मुंबईतील भविष्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही मागणी आता जोर धरु लागली आहे. उद्यानांच्या दैनंदिन देखभालीसाठी पुरेशा पाणी पुरवठयाची कायमस्वरुपी स्त्रोत म्हणून या विहिरींचे बांधकाम केले जावे अशी मागणी होत आहे.


मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केलीआहे. आपल्या ठरावाच्या सूचनेमध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेची जी जी उद्याने आहेत, हया उद्यानात सकाळ-संध्याकाळ नागरिक चालण्यासाठी येतात, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्यावर बसण्यासाठी येतात व लहान मुलेही खेळण्यासाठी येतात. शाळांना सुट्टया पडल्या की सदर उद्यानांमध्ये जास्त गर्दी पहावयास मिळते,असे नमुद केले.


उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय तसेच उद्यानांमधील हिरवळ (गवत) व शोभेची झाडे, वेली वर्षभर विशेषतः उन्हाळयात टवटवीत ठेवण्यासाठी नियमित आणि पुरेशा दररोज हजारो लिटर पाणीपुरवठयाची गरज असते. परंतु शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मूळातच मर्यादित असतो किंवा अनेकदा पाणीपुरवठयात कपातही केली जाते. तसेच, टँकरद्वारे पाणी मागवणे महापालिकेसाठी खर्चिक बाब आहे. त्यामुळे उद्यानाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी व वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी कूपनलिका (बोअरवेल) ही आजच्या काळातील एक अनिवार्य गरज बनली आहे. त्यामुळे हिरवळीच्या शाश्वत संगोपनाचा एक महत्वाचा भाग म्हणून मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी डॉ सईदा खान यांनी केली आहे.

Comments
Add Comment

BMC News : मुंबई रेबीज निर्मूलनासाठी महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्यात सामंजस्य करार

मुंबई : मुंबईतील (Mumbai) भटके श्वान (Dogs) व मांजरींचे (Cats) लसीकरणासाठी तसेच ‘रेबीजमुक्त मुंबई’ करण्यासाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने