हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र

मंत्री नितेश राणे यांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार


ठाकरे पुत्रांपेक्षा उत्तर भारतीय चांगली मराठी भाषा बोलतात


मराठीची सक्ती करायची असेल तर मदरशांमध्येही करा


मुंबई : हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू मराठीच्या नावावर राजकारण करत आहेत. आदित्य आणि अमित ठाकरे यांना जेवढी मराठी बोलता येत नाही, त्यापेक्षा अधिक चांगली मराठी आपल्या उत्तर भारतीय हिंदू बांधव आणि त्यांची मुले बोलतात. मराठी सक्ती गरीब उत्तर भारतीय लोकांवरच का केली जाते असा सवाल करत मराठीची सक्ती करायचीच असेल, तर मग ती मदरशांमध्येही व्हायला पाहिजे, मदरशांमध्येही मराठी भाषा शिकवली पाहिजे सांगत मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्याचा समाचार घेतला. ठाकरे बंधूंना मत म्हणजे पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या अब्बाला मत असेही त्यांनी यावेळी सांगितले.


गोरेगाव गोकूळधाममधील भाजप -शिवसेना महायुतीच्या उमेदवार प्रीती सातम यांच्या प्रचारासाठी गोरेगाव पूर्व येथील कन्यापाडा येथील चौकसभेत ते बोलत होते. कन्यापाडा परिसरात त्यांचे स्वागत 'जय श्री राम' घोषणांनी झाले. कन्यापाडा ते व्यासपीठापर्यंतचा परिसर जय जय श्रीरामाच्या नामघोषांनी दणाणून गेला होता.


हे हिंदू राष्ट्र, हिंदुत्व विचारधारेचे राष्ट्र आहे, हा महाराष्ट्र, ही मुंबई हिंदुत्वाच्या विचारधारेची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आपल्या हिंदू समाजाचे आहेत, त्यामुळे हिंदू समाजाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदूंकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यात आमची पीएचडी झालेली आहे. या हिंदू राज्यात, हिंदू समाजाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही खपवून घेणार नाही, असे राणे म्हणाले. निवडणूक असो वा नसो, काही चुकीचा त्रास जर आमच्या हिंदूंना देणार असाल, तर जसे आज निवडणुकीसाठी मत मागायला आलो आहे, तसेच पुढील वेळेला सांगणारही नाही आणि अशा जागेवर येईन की शुक्रवारचाही त्रास होईल. हा सर्व प्रकार माझ्या ५२ वॉर्डांत करण्याची हिंमत करू नका. ही आमची सातम बहीण एकटी नाही, तिच्या मागे आम्ही आहोत, हे आज मी इथून सांगून जात आहे. आपल्याला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. आज निवडणूक असू द्या किंवा नसू द्या आपल्याला हिंदू बनून जे करायचे ते करा, जो सण आपल्याला करायचा तो जोरात साजरा करा. हे आज मी आपल्याला सांगून जात आहे. आमच्या या मुंबईमध्ये फक्त आय लव्ह महादेव म्हणणारेच राहू शकतात. बाकी कुणालाच इथे जागा नाही, असेही नितेश राणे यांनी निक्षून सांगितले. त्यामुळे कुणाला घाबरवणे, धमकावणे अशा प्रकारची मस्ती यापुढे इथे चालणार नाही. १६ तारखेनंतर जो हिशोब करायचा असेल तो आम्ही चुकता करणार. जे हिंदू समाज मला ऐकत आहेत त्यांनी आता कोणत्याही प्रकारचा भीती बाळगायची गरज नाही, असा विश्वासही नितेश राणे यांनी जनतेला दिला.

Comments
Add Comment

RR vs MI : राजस्थानचा 'रॉयल' धमाका! मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप!

गुवाहाटी : आयपीएलच्या १९ व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) आपला दबदबा कायम राखला आहे. मंगळवारी झालेल्या

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

Maharashtra Delivery Boy Police Verification : यापुढे ‘डिलिव्हरी बॉईज’ची तपासणी बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कामगार मंत्र्यांचे गृह विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि

Gautam Birhade : गौतम बिर्‍हाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवे संचालक

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालक (प्रकल्प) पदी ज्येष्ठ अभियंता गौतम बिर्‍हाडे (Gautam Birhade)

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी