हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र

मंत्री नितेश राणे यांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार


ठाकरे पुत्रांपेक्षा उत्तर भारतीय चांगली मराठी भाषा बोलतात


मराठीची सक्ती करायची असेल तर मदरशांमध्येही करा


मुंबई : हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू मराठीच्या नावावर राजकारण करत आहेत. आदित्य आणि अमित ठाकरे यांना जेवढी मराठी बोलता येत नाही, त्यापेक्षा अधिक चांगली मराठी आपल्या उत्तर भारतीय हिंदू बांधव आणि त्यांची मुले बोलतात. मराठी सक्ती गरीब उत्तर भारतीय लोकांवरच का केली जाते असा सवाल करत मराठीची सक्ती करायचीच असेल, तर मग ती मदरशांमध्येही व्हायला पाहिजे, मदरशांमध्येही मराठी भाषा शिकवली पाहिजे सांगत मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्याचा समाचार घेतला. ठाकरे बंधूंना मत म्हणजे पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या अब्बाला मत असेही त्यांनी यावेळी सांगितले.


गोरेगाव गोकूळधाममधील भाजप -शिवसेना महायुतीच्या उमेदवार प्रीती सातम यांच्या प्रचारासाठी गोरेगाव पूर्व येथील कन्यापाडा येथील चौकसभेत ते बोलत होते. कन्यापाडा परिसरात त्यांचे स्वागत 'जय श्री राम' घोषणांनी झाले. कन्यापाडा ते व्यासपीठापर्यंतचा परिसर जय जय श्रीरामाच्या नामघोषांनी दणाणून गेला होता.


हे हिंदू राष्ट्र, हिंदुत्व विचारधारेचे राष्ट्र आहे, हा महाराष्ट्र, ही मुंबई हिंदुत्वाच्या विचारधारेची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आपल्या हिंदू समाजाचे आहेत, त्यामुळे हिंदू समाजाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदूंकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यात आमची पीएचडी झालेली आहे. या हिंदू राज्यात, हिंदू समाजाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही खपवून घेणार नाही, असे राणे म्हणाले. निवडणूक असो वा नसो, काही चुकीचा त्रास जर आमच्या हिंदूंना देणार असाल, तर जसे आज निवडणुकीसाठी मत मागायला आलो आहे, तसेच पुढील वेळेला सांगणारही नाही आणि अशा जागेवर येईन की शुक्रवारचाही त्रास होईल. हा सर्व प्रकार माझ्या ५२ वॉर्डांत करण्याची हिंमत करू नका. ही आमची सातम बहीण एकटी नाही, तिच्या मागे आम्ही आहोत, हे आज मी इथून सांगून जात आहे. आपल्याला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. आज निवडणूक असू द्या किंवा नसू द्या आपल्याला हिंदू बनून जे करायचे ते करा, जो सण आपल्याला करायचा तो जोरात साजरा करा. हे आज मी आपल्याला सांगून जात आहे. आमच्या या मुंबईमध्ये फक्त आय लव्ह महादेव म्हणणारेच राहू शकतात. बाकी कुणालाच इथे जागा नाही, असेही नितेश राणे यांनी निक्षून सांगितले. त्यामुळे कुणाला घाबरवणे, धमकावणे अशा प्रकारची मस्ती यापुढे इथे चालणार नाही. १६ तारखेनंतर जो हिशोब करायचा असेल तो आम्ही चुकता करणार. जे हिंदू समाज मला ऐकत आहेत त्यांनी आता कोणत्याही प्रकारचा भीती बाळगायची गरज नाही, असा विश्वासही नितेश राणे यांनी जनतेला दिला.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला