Pandharpur Temple | मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिरात भाविकांसाठी विशेष नियोजन; १३ व १४ जानेवारीला दर्शन वेळापत्रकात बदल

पंढरपूर : मकरसंक्रांती आणि भोगी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष दर्शन व व्यवस्थापन आराखडा राबवण्यात येत आहे. परंपरेनुसार साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल होत असून, यंदा महिला भाविकांसाठी दर्शन सुलभ करण्यावर मंदिर समितीने विशेष भर दिला आहे.



भोगीच्या दिवशी पहाटेचे वेळापत्रक बदलणार


मंगळवार, १३ जानेवारी रोजी भोगी उत्सवानिमित्त श्री रुक्मिणी मातेची काकड आरती व नित्यपूजा पहाटे ३.०० ते ४.३० या वेळेत होणार आहे. भोगी अर्पण करण्यासाठी माता व भगिनींना पहाटे ४.३० ते ५.३० या कालावधीत मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर अलंकार व पोषाख परिधान केल्यानंतर सकाळी ६.३० पासून दर्शन खुले करण्यात येणार आहे.


त्याच दिवशी श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती व नित्यपूजा पहाटे ४.३० ते ५.४५ या वेळेत पार पडेल. भाविकांसाठी *पहाटे ६.०० नंतर पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे.



संक्रांतीच्या दिवशी महिलांना दर्शनात प्राधान्य


बुधवार, १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्त नेहमीच्या पूजाविधीनंतर श्री रुक्मिणी मातेचे अलंकार परिधान करून दर्शन सुरू करण्यात येणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त माता व भगिनींना दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी पुरुष भाविकांनी शक्यतो मुखदर्शन घेण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.



१५ जानेवारीपासून नियमित व्यवस्था


गुरुवार, १५ जानेवारी रोजी काकड आरती, नित्यपूजा आणि दर्शन व्यवस्था पूर्ववत वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.



कडक बंदोबस्त आणि व्यवस्थापन


उत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शनरांगा, सुरक्षाव्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. कमांडो पथकांची नियुक्ती, व्हीआयपी दर्शनावर तात्पुरते निर्बंध, टोकन दर्शन व्यवस्था बंद ठेवणे आणि पूजेची संख्या मर्यादित करून भाविकांना अधिक वेळ दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हा उत्सव मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून, भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले यांनी केले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार