मकरसंक्रांती २०२६, १४ की १५ जानेवारी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मात मकरसंक्रांतीला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि सूर्योपासना केल्यास मोठे पुण्य लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीच्या स्वामित्वातील मकर राशीत प्रवेश करतात. म्हणजेच सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करतात आणि याच दिवसापासून सूर्य उत्तरायणाला प्रारंभ करतो.



मकरसंक्रांती २०२६ कधी आहे?


२०२६ साली मकरसंक्रांतीचा सण १४ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे १४ की १५ जानेवारी या संभ्रमाला पूर्णविराम मिळतो.



भारताच्या विविध भागांत मकरसंक्रांती वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते.


बिहार आणि उत्तर प्रदेशात — मकरसंक्रांती / खिचडी पर्व
पंजाब आणि हरियाणामध्ये — लोहडी
तामिळनाडूमध्ये — पोंगल
आसाममध्ये — माघ बिहू किंवा भोगली बिहू



मकरसंक्रांती २०२६ : पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ


पुण्यकाळ
दुपारी १५:१३ ते सायंकाळी १७:४५
कालावधी : २ तास ३२ मिनिटे


महापुण्यकाळ
दुपारी १५:१३ ते १६:५८
कालावधी : १ तास ४५ मिनिटे



दान–पुण्याचे धार्मिक महत्त्व


मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू, गजक आणि रेवडी वाटण्याची परंपरा आहे. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशातून सामाजिक ऐक्य जपला जातो. या दिवशी अन्नधान्य, तूप, तिळ, तांदूळ, डाळी, भाजीपाला, मीठ, खिचडी, वस्त्र आणि कम्बल दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.


धार्मिक मान्यतेनुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य प्रदान करते. यामुळे जीवनात सुख, समृद्धी, समाधान टिकून राहते. तसेच या दिवशी श्रद्धेने सूर्यदेवाची उपासना केल्यास मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि यश प्राप्त होते, असे मानले जाते.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२