आणखी एक धक्का, दगडू सकपाळांनंतर आणखी एक उबाठातून बाहेर पडले

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटासाठी नामुष्की झाली आहे, अवघ्या काही तासांत पक्षातून दोन महत्त्वाच्या नेत्यांनी फारकत घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. मनपासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. प्रचाराचा जोर वाढलेला आहे. या परिस्थितीत उबाठामध्ये झालेली ही गळती उद्धव यांच्या पक्षासाठी धक्कादायक मानली जात आहे.


सर्वप्रथम माजी आमदार दगडू सकपाळ यांनी उबाठाशी संबंध तोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. आता आणखी एका उद्धव समर्थकाने शिवसेना उबाठा सोडली आहे. गोरेगाव परिसरातील ठाकरे गटाचे जुने, विश्वासू नेते मानले जाणारे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तब्बल चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले दिलीप शिंदे यंदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र मनसे–ठाकरे गट युतीमुळे त्यांच्या पारंपरिक वॉर्डमध्ये उमेदवारीची संधी न मिळाल्याने ते नाराज होते, अशी माहिती समोर येत आहे.



उमेदवारीवरून असंतोष उफाळला


ज्या प्रभागातून दिलीप शिंदे सातत्याने निवडून येत होते, तो प्रभाग यंदा मनसेला देण्यात आल्याने त्यांची राजकीय गणिते बिघडली. या निर्णयानंतर त्यांनी काही दिवस पक्षात अस्वस्थता व्यक्त केली होती. अखेर मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.



सपकाळांच्या पक्षप्रवेशामागचे कारण


माजी आमदार दगडू सकपाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत, “अत्यंत कठीण मनाने निर्णय घ्यावा लागला,” असे सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या कन्या रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभा क्षेत्रातील एका प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याने सकपाळ कुटुंब नाराज असल्याचे बोलले जात होते. महानगरपालिका निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात ठाकरे गटातून होत असलेली ही गळती प्रचाराच्या रणनीतीवर किती परिणाम करणार, याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख