लुटनिक यांच्या दाव्यात तथ्यता नाही मोदींनी ट्रम्प यांच्याशी ७ ते ८ वेळा संवाद साधला- रणधीर जैसवाल

प्रतिनिधी: एकीकडे भारत व युएस यांच्यातील संबंधावर मोठा दावा युएस वाणिज्य विभागाचे सचिव हावर्ड लुटनिक यांनी केल्यानंतर त्यांचा संपूर्ण दावा काल पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी खोडून काढला. आम्ही असहमत असून संपूर्ण दावा नाकारत असून यामध्ये तथ्य नसल्याचे जैसवाल यांनी स्पष्ट केले. हावर्ड लुटनिक यांनी एका पोडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी संवाद साधण्याचे टाळले असल्याचे म्हटले होते.यावर भाष्य करताना, किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पीएम मोदी यांनी ७ ते ८ वेळा फोनवर संवाद साधला असल्याचे जैसवाल म्हणाले आहेत.


दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल असा व्यापारी करार करण्याची भारताची भूमिका आहे. भारताच्या बाजूनेही गेल्या फेब्रुवारीपासून अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे हा लुटनिक यांचा दावा चुकीचा आहे. भारतानेही अनेकदा सामंजस्याची भूमिका घेत बोलणी केली होती. त्यामुळे अनेकदा हा व्यापारी करार पूर्ण होईल अशी आशा निर्माण झाली होती. अद्याप यावर तोडगा निघाला नसला तरी युएसकडून केलेल्या गेलेल्या दाव्यात तथ्यता नाही. दरम्यान लुटनिक यांनी एका पोडकास्ट कार्यक्रमात ट्रम्प यांना कराराबाबत मोदीशी संवाद साधायचा होता परंतु मोदींनी संवाद साधला नाही. मोदी फोन करण्यात व उचलण्यास उत्सुक नव्हते असा धक्कादायक दावा लुटनिक यांनी केला होता. यापूर्वी या आठवड्याच्या सुरुवातीला लिंडसे ग्रॅहम यांनी सोशल मिडिया अकाऊंटवरून भारतावर ५००% टॅरिफ लावण्याचे सूचित केले होते. जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तानातील युद्ध माझ्या सांगण्यावरून थांबले या दाव्यांंनंतर दोन्ही देशातील कटुता आणखी वाढली असल्याचे सांगितले जाते.

Comments
Add Comment

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?