कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री नुकसानभरपाई जाहीर करणार

मुंबई : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकणातील मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आंबा व काजू पिकांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान, हवामानातील बदल आणि शेतकऱ्यांची अडचण यावर सविस्तर चर्चा झाली.





आंबा व काजू पिकांचे तब्बल ९० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर झाला असून, कोकणातील शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेले मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी या गंभीर परिस्थितीचा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून सखोल आढावा घेत, अधिवेशन संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा देणारी मदत जाहीर केली जाईल असे आश्वासन दिले.


या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण  राणे, खासदार सुनील तटकरे, कृषी मंत्री दत्ता भरणे , उद्योग मंत्री उदय सामंत , महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले , गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. भास्कर जाधव, आ. महेंद्र दळवी, आ. राजेंद्र गावित, आ. किरण सामंत आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Radhakrishna Vikhe Patil : “जरांगेंचं समाधान होत असेल तर राजीनाम्यास तयार”; विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

अहिल्यानगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं असून, मराठा आंदोलक नेते मनोज

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

Union Minister Son Arrested : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप; दारू पाजून शोषण केल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांचे पुत्र बंडी भगीरथ (Bandi Bhagirath) यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा