कोल्हापुरात उडाली खळबळ! दोन नवविवाहितांची आत्महत्या, सासरच्या छळाला कंटाळून संपवले जीवन

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या गाव खेड्यातून हुंडाबळी, छळ, यांसारख्या स्त्रियांवरील, नवविवाहितेवरील घटनांची मालिकाही वाढत चालली आहे. सासरी होणारे छळ, लाखोंचे हुंडे, किंवा वंशाच्या दिव्यासाठी नवविवाहितेवर सतत होणारे अत्याचार यांना कंटाळून अनेक महिलांनी आपले जीवन संपवले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि शिरोळ तालुक्यातून विवाहित महिलांच्या आत्महत्येच्या दोन संतापजनक घटना समोर आल्या असून, सासरकडील मानसिक व शारीरिक छळामुळेच या आत्महत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करत कारवाई सुरू केली आहे.



करवीर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


करवीर तालुक्यातील कांडगाव येथे नवविवाहित प्रतीक्षा तुषार कांबळे हिने घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात पती तुषार कांबळे आणि सासरे सारंग कांबळे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.



जयसिंगपूर-चिपरीत विवाहितेने पेट्रोल ओतून घेतला जीव


दुसरी घटना जयसिंगपूरजवळील चिपरी (ता. शिरोळ) येथून समोर आली आहे. येथे कोमल ऊर्फ कीर्ती किशोर आवळे (वय २७) हिने गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली. गंभीर अवस्थेत तिला सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच मध्यरात्री तिचा मृत्यू झाला.


या आत्महत्येप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. कीर्तीच्या लग्नाला बरीच वर्षे झाली तरी त्यांना बाळ नव्हते त्यामुळे सासरचे मंडळी नवऱ्याचे दुसरे लग्न लावून देऊ अश्या तिला धमक्या द्यायचे, सासरच्या मंडळी सतत तिच्यावर' जाच, तिचा छळ करत होते. त्यामुळे मानसिक न शारीरिक तणावातूनच कीर्तीने हे पाऊल उचलले आहे. असे तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे.


या तक्रारीच्या आधारे जयसिंगपूर पोलिसांनी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा आवळे, दीर अतुल आवळे आणि जाऊ कोमल अतुल आवळे (सर्व रा. चिपरी, ता. शिरोळ) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे.

Comments
Add Comment

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र