कोल्हापुरात उडाली खळबळ! दोन नवविवाहितांची आत्महत्या, सासरच्या छळाला कंटाळून संपवले जीवन

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या गाव खेड्यातून हुंडाबळी, छळ, यांसारख्या स्त्रियांवरील, नवविवाहितेवरील घटनांची मालिकाही वाढत चालली आहे. सासरी होणारे छळ, लाखोंचे हुंडे, किंवा वंशाच्या दिव्यासाठी नवविवाहितेवर सतत होणारे अत्याचार यांना कंटाळून अनेक महिलांनी आपले जीवन संपवले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि शिरोळ तालुक्यातून विवाहित महिलांच्या आत्महत्येच्या दोन संतापजनक घटना समोर आल्या असून, सासरकडील मानसिक व शारीरिक छळामुळेच या आत्महत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करत कारवाई सुरू केली आहे.



करवीर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


करवीर तालुक्यातील कांडगाव येथे नवविवाहित प्रतीक्षा तुषार कांबळे हिने घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात पती तुषार कांबळे आणि सासरे सारंग कांबळे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.



जयसिंगपूर-चिपरीत विवाहितेने पेट्रोल ओतून घेतला जीव


दुसरी घटना जयसिंगपूरजवळील चिपरी (ता. शिरोळ) येथून समोर आली आहे. येथे कोमल ऊर्फ कीर्ती किशोर आवळे (वय २७) हिने गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली. गंभीर अवस्थेत तिला सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच मध्यरात्री तिचा मृत्यू झाला.


या आत्महत्येप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. कीर्तीच्या लग्नाला बरीच वर्षे झाली तरी त्यांना बाळ नव्हते त्यामुळे सासरचे मंडळी नवऱ्याचे दुसरे लग्न लावून देऊ अश्या तिला धमक्या द्यायचे, सासरच्या मंडळी सतत तिच्यावर' जाच, तिचा छळ करत होते. त्यामुळे मानसिक न शारीरिक तणावातूनच कीर्तीने हे पाऊल उचलले आहे. असे तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे.


या तक्रारीच्या आधारे जयसिंगपूर पोलिसांनी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा आवळे, दीर अतुल आवळे आणि जाऊ कोमल अतुल आवळे (सर्व रा. चिपरी, ता. शिरोळ) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी