उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी


मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी बेकायदेशीरपणे पाणी,कर, पोलीस अशी विविध 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) सादर करण्याची सक्ती करतात. यापैकी एखादी एनओसी नसल्यास थेट उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणांमुळ; फेटाळण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या या मनमानी निर्णयाविरोधात एका अपक्ष उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे. तसेच, या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने यावर निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.


आगामी मुंबई महापालिका आगामी निवडणुकीसाठी कार्यरत असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यंदा उमेदवारांना विविध एनओसी सादर करण्याची सक्ती केलीय. यात पाणीपट्टी, विविध कर, पोलीस अशा सरकारी विभागांची ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) उमेदवारी अर्जासोबत सादर करणं अनिवार्य केलंय. तसंच ज्यांच्याकडे ही प्रमाणपत्रं नाहीत, त्यांचे अर्ज फेटाळून लावण्यात आलेत. अशा पद्धतीनं केवळ तांत्रिक आणि नियमबाह्य कारणास्तव थेट उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं फेटाळणं हे योग्य नाही. अपक्ष उमेदवार मोझम अली मीर यांनी याप्रकरणी वकील मोईनुद्दीन चौधरी यांच्यामार्फत ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय.


या एनओसी नसल्यास अर्ज फेटाळण्याचा आदेश रद्द करण्यात यावा. तसंच एनओसी नसल्यामुळं फेटाळलेल्या अर्जांचा तातडीनं पुनर्विचार करून त्या स्वीकारण्या याव्यात, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलीय. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकून घेत याप्रकरणी निवडणूक आयोगाला तातडीनं उत्तर देण्याचे निर्देश जारी करत शुक्रवारी यावर सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलंय. तसेच, याबाबत निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७

Mumbai Railway: 'या' स्थानकांदरम्यान लोकल सेवा तीन महिने बंद राहणार; मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार

मुंबई: मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवली