उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी


मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी बेकायदेशीरपणे पाणी,कर, पोलीस अशी विविध 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) सादर करण्याची सक्ती करतात. यापैकी एखादी एनओसी नसल्यास थेट उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणांमुळ; फेटाळण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या या मनमानी निर्णयाविरोधात एका अपक्ष उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे. तसेच, या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने यावर निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.


आगामी मुंबई महापालिका आगामी निवडणुकीसाठी कार्यरत असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यंदा उमेदवारांना विविध एनओसी सादर करण्याची सक्ती केलीय. यात पाणीपट्टी, विविध कर, पोलीस अशा सरकारी विभागांची ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) उमेदवारी अर्जासोबत सादर करणं अनिवार्य केलंय. तसंच ज्यांच्याकडे ही प्रमाणपत्रं नाहीत, त्यांचे अर्ज फेटाळून लावण्यात आलेत. अशा पद्धतीनं केवळ तांत्रिक आणि नियमबाह्य कारणास्तव थेट उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं फेटाळणं हे योग्य नाही. अपक्ष उमेदवार मोझम अली मीर यांनी याप्रकरणी वकील मोईनुद्दीन चौधरी यांच्यामार्फत ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय.


या एनओसी नसल्यास अर्ज फेटाळण्याचा आदेश रद्द करण्यात यावा. तसंच एनओसी नसल्यामुळं फेटाळलेल्या अर्जांचा तातडीनं पुनर्विचार करून त्या स्वीकारण्या याव्यात, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलीय. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकून घेत याप्रकरणी निवडणूक आयोगाला तातडीनं उत्तर देण्याचे निर्देश जारी करत शुक्रवारी यावर सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलंय. तसेच, याबाबत निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने